शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही जिल्ह्यात लॉकडाऊनची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पाहणीनिमित्ताने मुख्यमंत्री, मु्ख्य सचिव व आरोग्य सचिव यांचा दौरा होऊनही जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पाहणीनिमित्ताने मुख्यमंत्री, मु्ख्य सचिव व आरोग्य सचिव यांचा दौरा होऊनही जिल्ह्यात ना कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली, ना लसीकरणाचा वेग वाढला, ना आरोग्यासंदर्भातील प्रभावी उपाययोजना झाल्या. त्यामुळे हा दौरा नेमक्या कुठल्या कारणासाठी झाला याबाबत मात्र सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. एवढेच नव्हे तर रुग्णसंख्या इतकी वाढली की, राज्यात सर्वप्रथम जिल्ह्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन करावे लागल्याने जनमानसात उपाययोजनांबाबत नाराजीचा सूर आहे.

कोरोनाची लागण झाली त्या वेळी सुरुवातीच्या काळात अर्थात गेल्या वर्षी जिल्ह्यातील नागरिकांनी, प्रशासनाने गांभीर्याने नियमाचे पालन केल्याने गेल्या वर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात होता. मात्र या वर्षी मार्चच्या सुरुवातीपासून रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यातच १९ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अचानक धडगाव व मोलगी येथे दौरा ठरला. या संदर्भात राजकीय गोटात वेगवेगळे तर्क असले तरी सामान्य जनतेला मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने विकासाच्या योजना आणि कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांची आस लागून होती. मात्र जनतेचा भ्रमनिरास झाल्यागत स्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोलगी आणि धडगावला केवळ लसीकरणाची पाहणी व रुग्णांची विचारपूस केली नाही तर धडगावला कोरोना संदर्भातील उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बंदद्वार बैठकीत काय चर्चा झाली ती बाहेर आली नसली तरी लोकांमध्ये उच्चस्तरीय बैठकीत निश्चितच प्रभावी उपाययोजनांचे निर्णय झाले असावे, असा तर्क होता. पण मुख्यमंत्री रवाना झाल्यानंतर नवीन आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाही किंवा रुग्ण वाढत असल्याने उपचारासाठी नवीन कोविड सेंटरही सुरू झाले नाही. लसीकरणाबाबतही खूप काही वेग मिळाला अशी स्थिती नाही. याउलट रुग्णांची संख्या प्रचंड वाढू लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातदेखील नियमांचे पालन झाले नसल्याने दुर्गम भागात या दौऱ्यामुळेच रुग्ण वाढू लागल्याचे आरोप सुरू झाले आहेत. रुग्ण वाढत असल्याने उपाययोजनांना गती देण्याऐवजी प्रशासनाने दोन दिवस जनता कर्फ्यू व त्यानंतर १ एप्रिल ते १५ एप्रिल असे १५ दिवस लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे व्यापारी, मजूर, व्यावसायिक, उद्याेजक यांच्यात तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

दुसरीकडे रुग्णालये रुग्णांनी हाउसफुल्ल आहेत. गंभीर रुग्णांना स्थानिक स्तरावर उपचाराची सोय नसल्याने बहुतांश रुग्ण सुरत, अहमदाबाद, नाशिक, मुंबई, पुणे येथे जात असून त्यांच्यासाठी रुग्णवाहिका मिळणे दुरापास्त झाले आहे. रुग्णवाहिका आहे तर ऑक्सिजन नाही, रुग्णालयात बेड आहे तर ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर मोजकेच आहेत. अशा स्थितीत ऑक्सिजनअभावी गुदमरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. एकूणच या परिस्थितीमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, आता परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी जिल्हा प्रशासन, वैद्यकीय सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनीही पुन्हा एकदा कंबर कसून मानवतावादी भूमिकेतून कामाला लागण्याची गरज आहे.