शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

पोस यंत्राला ‘पोसणे’ झाले अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:56 IST

स्वस्तधान्य खरेदी-विक्रीत अडथळे : इंटरनेट कनेक्टीव्हीटी सुधारण्याची गरज

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : रेशनमध्ये होणारा काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने स्वस्तधान्य दुकानदारांना ‘पोस’ मशिन पुरविली आह़े परंतु नेट कनेक्टीव्हीटीअभावी ही यंत्रे शोभेच्या वस्तू झाल्या असल्याची माहिती आह़े हे चित्र प्रकर्षाने तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये दिसून येत़े या यंत्रामुळे दुकानदारांबरोबरच ग्राहकदेखील हैराण झाले आह़े नेट कनेक्टीव्हीटीबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा       आह़ेरेशनच्या काळाबाजार थांबविण्याबरोबरच या ‘पोस’ प्रमाणालीत पारदर्शीपणा आणण्यासाठी राज्य शासनाने यंदापासून आधार ‘थम’ लागू केले आह़े यासाठी शासनामार्फतच संबंधित स्वस्त धान्य दुकानचालकांना ‘पोस’ मशिन पुरविली आहेत़ या यंत्रामुळे संबंधित लाभाथ्र्याच्या आधार नंबर शोधून यंत्रावर त्याचा ‘थम’ घेऊन त्यास धान्य वितरीत केले            जात़े तळोदा तालुक्यातही 91 गावे आणि 23 पाडय़ांसाठी 108 दुकानदारांना परवाना देण्यात आला आह़े यासाठी येथील पुरवठा शाखेकडून त्यांना साधारण 98 यंत्रे पुरविण्यात आली आहेत़ गेल्या जुलै महिन्यापासून ही यंत्रे दुकानदारांना देण्यात आली आहेत़़ तथापि ही प्रणाली दुकानदरांबरोबरच ग्राहकांसाठीदेखील  डोकेदुखी ठरत आह़े कारण धान्य वितरीत करताना सातत्याने नेट कनेक्टीव्हीटीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असत़े विशेषत सातपुडय़ातील अतिदुर्गम भागातील कोठार, पाढळपूर, खर्डी, बंधारा, राणीपूर, धनपूर, टाकली, जांबाई, धवळीविहीर, रापापूर,चौगाव, इच्छागव्हान, एकधड, वाल्हेरी, आंबागव्हान अशा 30 ते 35 गाव, पाडय़ांमध्ये ही अडचण मोठय़ा प्रमाणात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े अशा ठिकाणी हे ‘पोस’ यंत्रे कुचकामी ठरले आह़े अर्थात जुन्या पध्दतीने लाभाथ्र्याना धान्य वाटप केले जात आह़े पुरवठा विभागाने या दुकानदारांना यंत्रात टाकण्यासाठी  विविध कंपन्याचे सीमकार्ड दिले असले तरी त्या-त्या गावांमध्ये संबंधित कंपनीने टॉवर नसल्याने रेंज उपलब्ध होत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे          आह़े वास्तविक रेशनच्या काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने आधार थम प्रणाली वितरण व्यवस्थेत लागू केल्याने साहजिकच जनतेमध्येदेखील समाधान व्यक्त केले जात होत़े परंतु यात सातत्याने तांत्रिक बिघाड होत असल्याने यात बराच वेळ वाया जात आह़े या शिवाय तासन्तास रांगेतही तात्कळत उभे राहावे लागत असल्याची लाभाथ्र्याची व्यथा आह़े तालुक्यातील सपाटीवरील गावांमध्ये रेंज  कमी असल्याच्या अडचणी असल्या तरी तेथेही सततच्या खंडीत वीज पुरवठय़ामुळे बॅटरी चाज्रीगचा प्रश्न निर्माण होत असतो़ तसेच लाभाथ्र्याने जोराने अंगठा यंत्रावर दाबला तर दोन वेळा पावत्या यंत्रातून निघतात त्यामुळे दुकानदारदेखील हतबल झाले  आहेत़ ही पोस प्रणाली ग्रामीण भागात सुरळीत करण्यासाठी रेंज कनेक्टीव्हीटी बाबत ठोस उपाय योजना करण्याची गरज आह़े त्याभागात कोणत्या कंपनीची सेवा अधिक प्रभावी आहे या विषयी आपल्या यंत्रणेमार्फत सव्रेक्षण करुन त्या कंपनीचे सीम कार्ड संबंधित दुकानदारांना उपलब्ध करुन दिले पाहिज़े याउलट तिथे ज्यांची रेंज नाह असे सिमकार्ड दुकानदारांना देण्यात आले आह़े या शिवाय ग्रामीण भागात सातत्याने खंडीत होणा:या वीजपुरवठय़ाबाबतही प्रशासनाने    ठोस पावले उचलणे आवश्यक आह़े अन्यथा शासनाने कितीही चांगल्या योजना जनतेसाठी आणल्या मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसेल तर ती योजना कुचकामी ठरत़े त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली सुरळीत आणि पारदर्शी होण्यासाठी नेट कनेक्टीव्हीटी  प्रकरणी ठोस उपाय योजना  करण्याची जनतेची मागणी  आह़े