शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

१६ रोजी जमीन कब्जा आंदोलन करण्यावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

तळोदा : नर्मदा बचाव आंदोलनाच्या जमीन कब्जा आंदोलनाच्या इशारानंतर विस्थापितांना जमिनीचा ताबा देण्यासाठी संबंधित प्रशासनाने कार्यवाही सुरू केली असून, ...

तळोदा : नर्मदा बचाव आंदोलनाच्या जमीन कब्जा आंदोलनाच्या इशारानंतर विस्थापितांना जमिनीचा ताबा देण्यासाठी संबंधित प्रशासनाने कार्यवाही सुरू केली असून, आतापर्यंत सात बाधितांना ताबा देण्यात आला. उर्वरितांनाही लवकरच ताबा देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे शहादा, तळोदा तालुक्यात शासनाने पुनर्वसन करून जमिनीचा सातबारा दिला असला तरी ज्या खासगी शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना देण्यात आल्या आहेत, त्याचा ताबा संबंधित शेतकरी देत नव्हते; कारण या शेतकऱ्यांना अजून शासनाने पैसे दिले नव्हते. म्हणून तेही जमिनीचा ताबा सोडत नव्हते. खासगी शेतकरी स्वतःच जमीन खेडत असत. इकडे आपल्याला जमिनीचा ताबा देण्यासाठी प्रकल्प बाधित शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत असत.

सरदार सरोवर व नर्मदा विकास विभाग, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यावर कार्यवाही करण्याऐवजी आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलत असत. या तिघांच्या चिलंम तंबाखूच्या खेळामध्ये नाहक विस्थापित भरडला जात होता. त्यांच्याकडे पाठपुरावा करताना कार्यालयांचे उंबरठे झिजवून अक्षरशः वैतागले होते. ११ विस्थापितांचा प्रश्न होता. शेवटी नर्मदा बचाव आंदोलनाने १६ जून रोजी प्रत्यक्ष शेतावर जाऊन जमीन कब्जा आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले.

गेल्या दोन दिवसांपासून तिन्ही यंत्रणा प्रत्यक्ष कामाला लागल्या आहेत. आतापर्यंत सातजणांना जमिनीचा ताबा देण्यात आलेला आहे. तरीही अजून चारजणांना ताबा दिला नसल्याने आज, बुधवारी जमीन कब्जा आंदोलन करण्याचा निर्णय ठाम असल्याचे आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. विस्थापितांना जमिनीचा सातबारा असताना त्यांना जमीन काढता येत नव्हती. तब्बल पाच ते सहा वर्षांच्या कालावधीनंतर जमीन मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तथापि अजूनही चारजणांना जमिनीचा ताबा देण्याचा प्रश्न कायम असल्याने नर्मदा विकास विभागाचा जमीन कब्जा आंदोलनाच्या निर्णय कायम असून, उद्या, बुधवारी ते कब्जा करणार असल्याचे आंदोलनाचे कार्यकर्ते चेतन साळवे यांनी सांगितले आहे.

नंदुरबारात आढावा बैठक

बुधवारी नंदुरबार येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, बबन काकडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी महेश सुधळकर, बचाव आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, पुण्या वसावे, ओरसिंग पटले उपस्थित होते. या वेळी विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबतचा आढावा घेताना कार्यकर्त्यांनी १९४ पुनर्वसन, जमिनी असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले. याशिवाय घर, प्लॉटचा विषयदेखील अधिकाऱ्यांपुढे उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी ठोस कार्यवाही करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यावेळी महेश पाटील यांनी त्यावर कार्यवाही करून हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.