शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

अमृत आहार योजनेचा चौकशी अहवाल शासनाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 12:33 PM

  रमाकांत पाटील  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन नंतर राबविण्यात आलेल्या अमृत आहार योजने संदर्भातील चौकशीचा ...

  रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन नंतर राबविण्यात आलेल्या अमृत आहार योजने संदर्भातील चौकशीचा अहवाल राज्य शासनाकडे चौकशी समितीने सादर केला आहे. या अहवालात अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या असून, आता शासन कोणावर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविताना नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यहार झाल्याचे तसेच आहार उशिराने वाटप केल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या होत्या. या संदर्भात ‘लोकमत’ने ही बाब सर्व प्रथम समोर आणल्यानंतर प्रकल्प स्तरीय बैठकीत त्यावर चर्चा झाली. जिल्हा परिषद सदस्यांनीही हे प्रकरण लावून धरले. त्यामुळे जिल्हा परिषद स्तरावर त्याची चौकशी झाली. परंतु तक्रारी थेट शासनापर्यंत गेल्याने आदिवासी विकास विभागाने आदिवासी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमूण चौकशी करण्याचे आदेश दिले होते.याबाबत ३ ऑगस्टला चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीला चौकशी अहवाल सादर करण्यास सात दिवसांची मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रभावामुळे विलंब लागणार असल्याने पुन्हा या समितीला एक महिन्याची मुदत     देण्यात आली. समितीने आपला चौकशी अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता. तथापि त्यात काही विषय जिल्हा परिषदेशी निगडीत असल्याने   आदिवासी विकास विभागाचे सहसहिव भा.र.गावीत यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून तीन विषयांसदर्भात स्थानिक स्तरावर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या तीन विषयांमध्ये जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एप्रिल ते जुलै या काळात अमृत आहार एक ते दीड महिना उशिरा मिळाला. त्यामुळे या कालावधीत लाभार्थ्यांचे कुपोषण झाल्याने योजनेच्या मुळ उद्देशालाच धक्का पोहोचल्याचे म्हटले आहे. तसेच जिल्ह्यातील दोन हजार २३९अंगणवाडी सेविकांना एकाच पुरवठा धारकाकडून करण्यात आली. या संदर्भात जिल्हास्तरावरून आहाराच्या मागणीची मुद्रीत प्रतही सर्व अंगणवाड्यांंना वितरित करण्यात आली. त्यात पुरवठा कोणत्या कालावधीत याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. खरेदी केलेल्या मालाच्या किमतीही जास्त आहेत. अनेक अंगणवाडी सेविकांना आहार पुरवठा कुठून झाला याबाबतही माहिती नाही. लॉकडाऊनच्या काळात स्थानिक दुकानदार आहार पुरवठा करण्यास तयार असूनही, त्यांना याबाबत विचार करण्यात आले नाही. त्यामुळे एकूणच या सर्व विषयांसदर्भात शासनाने मुख्य अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला होता. तो खुलासाही सादर झाला असून, शासनाने अहवाल मान्य केला आहे. त्यामुळे आता शासन नेमकी काय व कोणावर कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.