शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

क्वॉरंटाईन सेंटरमधील समस्यांनी केले हैराण, नागरिक झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : क्वारंटाईन केलेल्या लोकांची आरोग्य तपासणी नाही, स्वॅब घेणे नाही, केंद्रातील असुविधा यामुळे नंदुरबारातील तिन्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : क्वारंटाईन केलेल्या लोकांची आरोग्य तपासणी नाही, स्वॅब घेणे नाही, केंद्रातील असुविधा यामुळे नंदुरबारातील तिन्ही क्वॉरंटाईन केंद्रात दाखल लोकांमध्ये नाराजी आहे. अगदी कारागृहात कोंडल्यासारखी स्थिती झाली असून कोरोनापासून वाचविण्यासाठी उलट त्यात ढकलण्याचा हा प्रकार असल्याची भावना या लोकांची झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.नंदुरबारात तीन ठिकाणी क्वॉरंटाईन केंद्र आहे. त्यात पॉलिटेक्नीक महाविद्यालयाचे वसतिगृह, होळ शिवारातील आदिवासी शासकीय मुलींचे वसतिगृह आणि समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह यांचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून जवळपास १२५ पेक्षा अधीकजण दाखल करण्यात आले आहेत. परंतु या केंद्रांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याची तक्रार आहे. पॉलिटेक्निक वसतिगृहाच्या केंद्रात तर सर्वाधिक समस्या आहेत. उरलेले अन्न, कचरा, तेथील कर्मचाऱ्यांनी घातलेले पीपीई किट परिसरातच टाकला जात आहे. तेथे मोकाट गुरे चरत असतात. यामुळे प्रादुर्भावची शक्यता आणखी वाढली आहे. याशिवाय या ठिकाणी पाण्याची देखील समस्या आहे.स्रानगृह आणि स्वच्छतागृहातील नळांना पाणी येत नाही. एका ड्रममध्ये पाणी भरून ठेवले जाते. त्यातूनच सर्वजण पाणी घेत असतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका आणखी वाढला आहे. येथे देण्यात येणाºया जेवनाची क्वॉलिटी देखील दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. शुक्रवारी दिल्या गेलेल्या जेवनातील टमाटरमध्ये अळ्या निघाल्याची तक्रार काहींनी केली.गुरुवारी तापी-नर्मदा इमारतीमधील क्वॉरंटाईन लोकांनी विविध मागण्यांसाठी थेट क्वॉरंटाईन केंद्रातील मोकळ्या जागेत येऊन आम्हाला घरी जाऊ द्या अशी मागणी केली. अखेर अधिकाºयांनी समजविल्यानंतर तेथील लोकं शांत झाले.एकुणच क्वॉरंटाईन केंद्रातील लोकांमधील नाराजी वाढत असून तातडीने सुधारणा कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे.

क्वॉरंटाईन केंद्रात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तेथे दाखल असलेल्यांच्या तक्रारींची लागलीच दखल घेतली जात आहे. वैद्यकीय पथक देखील त्या ठिकाणी २४ तास तैणात आहे. जेवनाचा दर्जाही चांगला ठेवला जात आहे. तरीही काही तक्रारी असल्यास त्याची दखल घेऊन त्या सोडविल्या जातील. क्वॉरंटाईन लोकांनी देखील सहकार्य करणे अपेक्षीत आहे.-भाऊसाहेब थोरात,तहसीलदार, नंदुरबार.