शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

क्वॉरंटाईन सेंटरमधील समस्यांनी केले हैराण, नागरिक झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 11:44 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : क्वारंटाईन केलेल्या लोकांची आरोग्य तपासणी नाही, स्वॅब घेणे नाही, केंद्रातील असुविधा यामुळे नंदुरबारातील तिन्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : क्वारंटाईन केलेल्या लोकांची आरोग्य तपासणी नाही, स्वॅब घेणे नाही, केंद्रातील असुविधा यामुळे नंदुरबारातील तिन्ही क्वॉरंटाईन केंद्रात दाखल लोकांमध्ये नाराजी आहे. अगदी कारागृहात कोंडल्यासारखी स्थिती झाली असून कोरोनापासून वाचविण्यासाठी उलट त्यात ढकलण्याचा हा प्रकार असल्याची भावना या लोकांची झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.नंदुरबारात तीन ठिकाणी क्वॉरंटाईन केंद्र आहे. त्यात पॉलिटेक्नीक महाविद्यालयाचे वसतिगृह, होळ शिवारातील आदिवासी शासकीय मुलींचे वसतिगृह आणि समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह यांचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून जवळपास १२५ पेक्षा अधीकजण दाखल करण्यात आले आहेत. परंतु या केंद्रांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याची तक्रार आहे. पॉलिटेक्निक वसतिगृहाच्या केंद्रात तर सर्वाधिक समस्या आहेत. उरलेले अन्न, कचरा, तेथील कर्मचाऱ्यांनी घातलेले पीपीई किट परिसरातच टाकला जात आहे. तेथे मोकाट गुरे चरत असतात. यामुळे प्रादुर्भावची शक्यता आणखी वाढली आहे. याशिवाय या ठिकाणी पाण्याची देखील समस्या आहे.स्रानगृह आणि स्वच्छतागृहातील नळांना पाणी येत नाही. एका ड्रममध्ये पाणी भरून ठेवले जाते. त्यातूनच सर्वजण पाणी घेत असतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका आणखी वाढला आहे. येथे देण्यात येणाºया जेवनाची क्वॉलिटी देखील दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. शुक्रवारी दिल्या गेलेल्या जेवनातील टमाटरमध्ये अळ्या निघाल्याची तक्रार काहींनी केली.गुरुवारी तापी-नर्मदा इमारतीमधील क्वॉरंटाईन लोकांनी विविध मागण्यांसाठी थेट क्वॉरंटाईन केंद्रातील मोकळ्या जागेत येऊन आम्हाला घरी जाऊ द्या अशी मागणी केली. अखेर अधिकाºयांनी समजविल्यानंतर तेथील लोकं शांत झाले.एकुणच क्वॉरंटाईन केंद्रातील लोकांमधील नाराजी वाढत असून तातडीने सुधारणा कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे.

क्वॉरंटाईन केंद्रात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तेथे दाखल असलेल्यांच्या तक्रारींची लागलीच दखल घेतली जात आहे. वैद्यकीय पथक देखील त्या ठिकाणी २४ तास तैणात आहे. जेवनाचा दर्जाही चांगला ठेवला जात आहे. तरीही काही तक्रारी असल्यास त्याची दखल घेऊन त्या सोडविल्या जातील. क्वॉरंटाईन लोकांनी देखील सहकार्य करणे अपेक्षीत आहे.-भाऊसाहेब थोरात,तहसीलदार, नंदुरबार.