शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

राज्यपालांनी दिला आदिवासींना उत्कर्षाचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 5:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मी देखील अतीदुर्गम डोंगराळ भागातून आलो आहे. आजही माङया गावाला जाण्यासाठी एक-दिड किलोमिटर पायी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मी देखील अतीदुर्गम डोंगराळ भागातून आलो आहे. आजही माङया गावाला जाण्यासाठी एक-दिड किलोमिटर पायी चालावे लागते. त्यामुळे तुमचे दु:ख आणि माङो दु:ख एक आहे या शब्दात आदिवासींची आपुलकी साधत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दु:खाचे रडगाणे करत बसण्यापेक्षा शिका, मेहनत घ्या, संघर्ष करा आणि जिद्दीने जिवनाचा उत्कर्ष साधा असा मंत्र त्यांनी यावेळी आदिवासींना दिला.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरुवारी सातपुडय़ाच्या अतीदुर्गम भागातील मोलगी व भगदरी येथील दौ:यावर आहेत. नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे अगोदर सकाळी साडेनऊ च्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर मोलगीला आले. तेथून शासकीय विश्रामगृहावर अधिका:यांशी चर्चा केल्यानंतर मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्राचे त्यांनी उद्घाटन केले. त्यानंतर तेथे दाखल बालकांची पहाणी करून त्यांच्या पाल्यांशी संवाद साधला. त्यानंतर ग्रामिण रुग्णालयाची पहाणी केली. तेथून थेट भगदरी येथील अंगणवाडी व लघु तलावाची पहाणी केली. त्याच ठिकाणी बांधण्यात आलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटनही त्यांनी केले. त्या ठिकाणी आदिवासीच्या सांस्कृतिक ठेव्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते त्याची पहाणी केली आणि तेथेच आदिवासींशी संवादही साधला. तत्पुर्वी आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी आदिवासी परंपरेनुसार त्यांना फेटा बांधून तसेच होळीतील प्रसिद्ध मोरखी टोप देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित आदिवासींनी वीज, पाणी, शिक्षण, रोजगार, आरोग्य, वनदावे, वनगावे आदी संदर्भातील प्रश्नांचा पाढा वाचला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी विजेचा प्रश्न गांभिर्याने घेत संबधीत अधिका:यांच्या साक्षीने सहा महिन्यात 24 तास वीज पुरवठा करण्याबाबतच्या सुचना केल्या. 132 के.व्ही.चे केंद्र तात्काळ कार्यान्वीत करण्यासाठी मदतीची ग्वाही देतांना अधिका:यांनी जर मुदतीत काम पुर्ण केले नाही तर सहा महिन्यानंतर येथील आदिवासींसोबत आपणही या अधिका:यांना घेराव घालू असा मिश्कील टोलाही मारला. शासनाचा विविध योजनांचा लाभ लोकांर्पयत पोहचतो की नाही त्याचीही त्यांनी उपस्थितांकडून खातरजमा केली. विकासाचे काम सुरू राहील पण आपण आपली कामे व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मेहनत घ्या, मुलांना शिकवा, चांगले संस्कार द्या ते निश्चितच उद्याचे राष्ट्रपती होतील असे स्वप्न दाखवत त्यांनी आदिवासींना धीर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. आकांक्षीत जिल्ह्यासाठी असलेला कार्यक्रम या भागात राबविला जाईल त्यामुळे विकासाला गती येईल असेही त्यांनी सांगितले.