शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांनी दिला आदिवासींना उत्कर्षाचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 17:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मी देखील अतीदुर्गम डोंगराळ भागातून आलो आहे. आजही माङया गावाला जाण्यासाठी एक-दिड किलोमिटर पायी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मी देखील अतीदुर्गम डोंगराळ भागातून आलो आहे. आजही माङया गावाला जाण्यासाठी एक-दिड किलोमिटर पायी चालावे लागते. त्यामुळे तुमचे दु:ख आणि माङो दु:ख एक आहे या शब्दात आदिवासींची आपुलकी साधत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दु:खाचे रडगाणे करत बसण्यापेक्षा शिका, मेहनत घ्या, संघर्ष करा आणि जिद्दीने जिवनाचा उत्कर्ष साधा असा मंत्र त्यांनी यावेळी आदिवासींना दिला.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरुवारी सातपुडय़ाच्या अतीदुर्गम भागातील मोलगी व भगदरी येथील दौ:यावर आहेत. नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे अगोदर सकाळी साडेनऊ च्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर मोलगीला आले. तेथून शासकीय विश्रामगृहावर अधिका:यांशी चर्चा केल्यानंतर मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्राचे त्यांनी उद्घाटन केले. त्यानंतर तेथे दाखल बालकांची पहाणी करून त्यांच्या पाल्यांशी संवाद साधला. त्यानंतर ग्रामिण रुग्णालयाची पहाणी केली. तेथून थेट भगदरी येथील अंगणवाडी व लघु तलावाची पहाणी केली. त्याच ठिकाणी बांधण्यात आलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटनही त्यांनी केले. त्या ठिकाणी आदिवासीच्या सांस्कृतिक ठेव्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते त्याची पहाणी केली आणि तेथेच आदिवासींशी संवादही साधला. तत्पुर्वी आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी आदिवासी परंपरेनुसार त्यांना फेटा बांधून तसेच होळीतील प्रसिद्ध मोरखी टोप देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित आदिवासींनी वीज, पाणी, शिक्षण, रोजगार, आरोग्य, वनदावे, वनगावे आदी संदर्भातील प्रश्नांचा पाढा वाचला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी विजेचा प्रश्न गांभिर्याने घेत संबधीत अधिका:यांच्या साक्षीने सहा महिन्यात 24 तास वीज पुरवठा करण्याबाबतच्या सुचना केल्या. 132 के.व्ही.चे केंद्र तात्काळ कार्यान्वीत करण्यासाठी मदतीची ग्वाही देतांना अधिका:यांनी जर मुदतीत काम पुर्ण केले नाही तर सहा महिन्यानंतर येथील आदिवासींसोबत आपणही या अधिका:यांना घेराव घालू असा मिश्कील टोलाही मारला. शासनाचा विविध योजनांचा लाभ लोकांर्पयत पोहचतो की नाही त्याचीही त्यांनी उपस्थितांकडून खातरजमा केली. विकासाचे काम सुरू राहील पण आपण आपली कामे व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मेहनत घ्या, मुलांना शिकवा, चांगले संस्कार द्या ते निश्चितच उद्याचे राष्ट्रपती होतील असे स्वप्न दाखवत त्यांनी आदिवासींना धीर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. आकांक्षीत जिल्ह्यासाठी असलेला कार्यक्रम या भागात राबविला जाईल त्यामुळे विकासाला गती येईल असेही त्यांनी सांगितले.