शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील गोंधळामुळे शासनाचा निधीही पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST

अक्कलकुवा ग्रामपंचायतीला राज्यशासनाकडून देण्यात आलेल्या ५० लाख रूपयांच्या स्वनियोजित निधीतून भूमीगत गटारी व इतर कामे करण्याचे आदेश देण्यात आले ...

अक्कलकुवा ग्रामपंचायतीला राज्यशासनाकडून देण्यात आलेल्या ५० लाख रूपयांच्या स्वनियोजित निधीतून भूमीगत गटारी व इतर कामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. २०१८-१९ या वर्षात या भगवा चाैक, हनुमान मंदिर चाैक, श्रीराम चाैक, झेंडा चौक या भागात ही भूमिगत गटारींची कामे होणार होती. यासाठी पंचायत समिती बांधकाम विभागाने काम घेत ठेकेदार नियुक्त केला होता. परंतू ग्रामपंचायतीने गटारींच्या कामात अडथळा येत असल्याचे लेखी देवून हे काम गावातील श्रीराम कॉलनीत एकाच ठिकाणी करण्याचे सूचित केले होते. यात पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या बेबनाव झाल्याची माहिती आहे. चार ठिकाणी मंजूरी दिलेल्या गटारींचे काम एकाच ठिकाणी मंजूर करण्याच्या निर्णयामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाही ग्रामपंचायतीकडून एकाच ठिकाणी गटारी तयार करुन घेण्यात आल्या आहेत. यातून सादर झालेले बिल हे त्याच कामाचा भाग आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेत बोगस बिल काढून फसवणूक होत असल्याचे पत्र दिल्याने खळबळ उडाली होती. हे पत्र देणा-या ग्रामसेविकेकडून ग्रामविकास विभागाने चार्ज काढून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. असे असले तरी श्रीराम कॉलनीत राज्य शासनाची परवानगी घेत केलेल्या नियमबाह्य कामाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीकडून दबाव येत असताना संबधित अधिका-यांनी जिल्हा परिषदेला सूचित करणे आवश्यक असतानाही तशी सूचना न करता चार ठिकाणी होणा-या गटारींचे काम एकाच ठिकाणी करुन निधी खर्च करण्याचा प्रकार दाखवला गेल्याने ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यात नेमका बेबनाव कशावरुन हे मात्र उलगडलेले नाही. विशेष बाब म्हणजे ५०लाखांच्या निधीतून केवळ एकच काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित निधीतील कामे ग्रामपंचायतीकडून अद्याप सूचितही करण्यात आलेली नाहीत. २०१८-१९ पासून हा निधी ग्रामपंचायतीसाठी राखीव आहे.

याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी यांना संपर्क केला असता, या प्रकरणाचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोन दिवसात देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायत सरपंच राजेश्वरी वळवी यांना संपर्क केला असता होवू शकला नाही. जिल्हा परिषदेत पत्र देणा-या ग्रामसेविकेकडून पदभार काढून घेण्यात आल्याने याठिकाणी ग्रामविकास अधिकारी दोन दिवसात नियुक्त करण्यात येणार आहे. यानंतरही या प्रकरणाचा गुंता सूटून अक्कलकुवा शहरात विकासकामे होणार की ग्रामपंचायतीकडून केवळ खर्चिक निधी दाखवला जाणार याकडे नागरीकांचे लक्ष लागून आहे.