शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

चार बाजार समितींचे वाचले लाखो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 11:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितींच्या संचालकांची निवडणूक आता जुन्याच पद्धतीने घेण्याचे ठरविण्यात आल्याने येत्या सहा महिन्यात निवडणुका ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितींच्या संचालकांची निवडणूक आता जुन्याच पद्धतीने घेण्याचे ठरविण्यात आल्याने येत्या सहा महिन्यात निवडणुका होणाऱ्या शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा बाजार समितींचे लाखो रुपये वाचले आहेत. या बाजार समितींना प्रत्येकी ४० ते ८० लाख रुपये खर्च निवडणुकीसाठी लागला असता. आता तो खर्च आठ ते १५ लाखांवर येणार आहे. या निर्णयामुळे बाजार समितींसह शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.कृषी उत्पन्न बाजार समितींची निवडणूक ही थेट शेतकºयांमधून घेण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. या निर्णयामुळे बाजार समितींना मोठा आर्थिक फटका बसणार होता. त्या नियमाअंतर्गत जिल्ह्यातील एकाही बाजार समितीची निवडणूक झाली नाही. परंतु येत्या सहा महिन्याच्या आत जिल्ह्यातील तीन बाजार समितींच्या निवडणुका थेट शेतकºयांमधून होणार होत्या. परिणामी बाजार समितींना मोठा आर्थिक फटका बसणार होता. परंतु आघाडी सरकारने हा निर्णय बदलल्याने आता हा पैसा वाचणार आहे.दरम्यान, बाजार समितींची आर्थिक स्थिती लक्षात घेता आघाडी शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. यामुळे बाजार समितींचे लाखो रुपये वाचणार आहेत. लोकाभिमुख आणि शेतकरी हिताचा निर्णय झाल्याने बाजार समितींच्या आर्थिक बाजू राखली जाणार असल्याचे मत नंदुरबार बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांनी व्यक्त केले.काय होता कायदाभाजप सरकारने घेतलेल्या निर्णयात तालुक्यातील अर्थात बाजार समिती क्षेत्रातील किमान १० गुंठे शेती असलेला व किमान तीन ते चार वेळा बाजार समितीत शेतीमाल विकणारा प्रत्येक शेतकरी या निवडणुकीत मतदानासाठी पात्र होता. त्यामुळे मतदार शेतकºयांची संख्या हजारोंच्या घरात जात होती. याशिवाय विविध कार्यकारी सोसायटी आणि हमालमापाडीमधून निवडून येणारे संचालक वेगळे राहणार होते. एवढ्या सर्व मतदारांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्याकरीता मोठी यंत्रणा राबवावी लागत होती. परिणामी खर्च अधीक वाढणार होता.किमान ४० ते ८० लाख खर्चबाजार समितीचे कार्यक्षेत्र आणि तालुक्याचा विस्तार व एकुण मतदार शेतकºयांची संख्या यावर निवडणुकीचा खर्च आधारीत होता. एका मतदार शेतकºयामागे ८० ते १०० रुपये खर्च गृहीत धरून जिल्हा उपनिबंधकांकडून तेवढ्या रक्कमेची आगावू मागणी संबधीत कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात येत होती.शहादा बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. परिणामी ही प्रक्रिया राबविण्यासाठी येणारा अदमासे ६० ते ७० लाख रुपयांचा खर्चाची तजवीज बाजार समितीला करावी लागणार होती. तेवढ्या रक्कमेची मागणी संबधीत विभागाकडून करण्यात आली होती. अशीच स्थिती तळोदा व अक्कलकुवा बाजार समितींची राहणार होती.आता आठ ते १५ लाख खर्चजुन्याच पद्धतीने निवडणूक होणार असल्याने आता निवडणुकीसाठीचा खर्च अवघा आठ ते १५ लाखाच्या दरम्यान राहणार आहे. तेवढ्या रक्कमेची सोय बाजार समिती आपल्या परीने करीत असतात. निर्णय बदलण्यात आल्याने शहादा बाजार समितीचे उदाहरण घेतल्यास तब्बल ४० ते ४५ लाख रुपये वाचणार आहे. त्यामुळे बाजार समितींना हायसे वाटले आहे.आर्थिक परिस्थिती जेमतेमजिल्ह्यातील सहाही बाजार समितींचा विचार करता त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. केवळ बाजार फीचे उत्पन्न त्यांना मिळत असते. काही बाजार समितींच्या कर्मचाºयांचे पगार अनेक महिने थकले आहेत. त्यात हा भुर्दंड बाजार समितींना पेलावणारा नव्हता हे स्पष्ट होते.

भाजप सरकारने थेट शेतकऱ्यांमधून निवडणूक घेण्याचा निर्णय तर घेतला होता, परंतु त्यासाठी येणारा खर्च शासनाने करावा अशी मागणी बाजार समितींनी केली होती. परिणामी राज्यातील अनेक बाजार समितींच्या संचालक मंडळांची मुदत संपूनही याच कारणामुळे त्यांनी निवडणुकाच घेतल्या नसल्याची स्थिती आहे. आता मात्र त्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे.