शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातही २३ जानेवारीपासून शेतकऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST

संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी कामगार २३ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत ४ दिवस ठिय्या महामुक्काम आंदोलन करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून ...

संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी कामगार २३ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत ४ दिवस ठिय्या महामुक्काम आंदोलन करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती सत्यशोधकचे अध्यक्ष रामसिंग गावित, सेक्रेटरी करन्सिंग कोकणी व संघटक किशोर ढमाले यांनी दिली.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने (महाराष्ट्र) मुंबईत १२ जानेवारीला झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील आंदोलनाची रणनीती जाहीर केली. २३ ते २६ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांचा भाग असणाऱ्या शेकडो संघटना एकजुटीने करणार आहेत.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणखी निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. तसेच १८ जानेवारी रोजी ‘किसान महिला दिवस’ देशभर साजरा करण्याची हाक दिली आहे. महाराष्ट्रात या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातील विविध समविचारी किसान, कामगार संघटना तसेच सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येऊन या आंदोलनात संपूर्ण ताकदीने उतरत आहेत. सत्यशोधकचे कार्यकर्ते नुकतेच दिल्ली शाहाजांपूर व टिकरी बॉर्डर वरील आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन परतले असूनही मुंबई आंदोलनात ताकदीने उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आर. टी. गावित, जिल्हा सचिव रणजित गावित यांनी सांगितले.

विविध संघटना २३ जानेवारी रोजी राज्यातील विविध भागांमधून ट्रॅक्टर्स व इतर वाहनांमधून हजारो श्रमिकांसह मुंबईच्या दिशेने निघतील. २४ जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे सर्वजण एकत्र येतील व २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता राजभवनाच्या दिशेने कूच करतील. २६ जानेवारी रोजी शेतकरी कामगारांतर्फे आझाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वजवंदन केले जाईल, असे कोकणी, गावित व ढमाले यांनी सांगितले.

सत्यशोधक शेतकरी सभेचे १५०० कार्यकर्ते २३ जानेवारी रोजी विसरवाडी येथे क्रांतिवीर तंट्या भिल व सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करतील. त्यात ५०० महिलांचा सहभाग असेल, असे नंदुरबार तालुका अध्यक्षा लिलाबाई वळवी, नवापूर तालुका अध्यक्षा गेवाबाई गावित यांनी सांगितले.