शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तोरणमाळजवळ घाटात जीप कोसळून आठ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. गाडी दरीत कोसळली तेव्हा काही जणांनी जीव ...

हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. गाडी दरीत कोसळली तेव्हा काही जणांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतून बाहेर उड्या टाकल्यामुळे जबर मार लागून काही जखमी झाले आहेत. दरीत ज्या ठिकाणाहून गाडी खाली कोसळली त्या वाटेत ठिकठिकाणी प्रवाशांचे मृतदेह पडून होते.

या गाडीत ३० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. गाडी दरीत कोसळल्याने बचाव आणि मदतकार्याला मोठा अडथळा येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली.

अतिशय खडतर असलेल्या या भागात आताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रस्ता बनला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा भाग तोरणमाळसोबत जोडला गेला आहे. मात्र, असे असले तरी अवघ्या सहाच महिन्यांत या रस्त्यावर हा दुसरा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे, हा सगळा भाग मोबाइल नेटवर्क नसलेला आणि खडतरही असल्याने या ठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत. पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य राबवत असून जखमींना तोरणमाळ, म्हसावद या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले जात आहे.