शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन एकरातील केळी पिकाची वाढ खुंटल्यामुळे फिरविला नांगर

By मनोज शेलार | Updated: May 26, 2024 19:36 IST

वाण्याविहीर गावालगत मोठ्या प्रमाणावर बागायत शेती केली जाते.

नंदुरबार : अवकाळी, गारपिटीसह विविध अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करत केळीचे पीक वाढविले, त्यावर लाखोंचा खर्च केला तो भरघोस उत्पन्न मिळणार या आशेने, परंतु गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्याच्या आशा पुरत्या मावळतीला आल्या. काही केल्या केळीची वाढच होत नसल्याने हतबल झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील कन्हैयालाल परदेशी या शेतकऱ्याने तब्बल साडेतीन एकरातील केळी पिकावर नांगर फिरविला आहे.

वाण्याविहीर गावालगत मोठ्या प्रमाणावर बागायत शेती केली जाते. मात्र, दिवसेंदिवस तापमानात होत असलेल्या कमालीच्या वाढीमुळे केळी या बागायती पिकांना भरपूर पाण्याची गरज असल्याने पुरेसे पाणी देऊनही पिकांची वाढ खुंटते व पिके जळू लागली आहेत. तसेच, योग्य प्रकारे उत्पन्न निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

मे महिन्यात साधारणतः रोजचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. परिसरात जमिनीचा पोत अतिशय उत्तम व काळी कसदार गाळाची जमीन असूनदेखील वाढत्या तापमानाचा फटका या नगदी पिकांना बसू लागला आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकरी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे.

वाण्याविहीर येथील कन्हैयालाल परदेशी यांनी गावालगत असलेल्या साडेतीन एकरातील केळी पिकाची वाढ वाढत्या तापमानामुळे होत नसल्यामुळे चार महिन्यांच्या केळी बागेवर नांगर फिरविला, तसेच नवीन पीक घेण्यासाठी शेत तयार करून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याच शेतकऱ्याची तीन ते चार एकर केळीची बाग तेरा महिन्यांची झाली असून, वाढलेल्या तापमानामुळे केळी योग्य प्रकारे तयार झाली नसल्याने मातीमोल भावात विकली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबारFarmerशेतकरी