शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

सुविधेअभावी प्रवाशांच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:39 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आलेली पाणपोई गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडली आह़े यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आलेली पाणपोई गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडली आह़े यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून पाणी खरेदी करुन प्यावे लागत आह़े याकडे परिवहन महामंडळाने लक्ष द्यावे यासाठी नागरिकांनी पाठपुरावा केला होता़  नंदुरबार जिल्ह्याचा विकास व प्रवाशांचा वाढता विस्तार लक्षात घेत आठ वर्षापूर्वी नंदुरबार आगारामार्फत बसस्थानकाचाही विस्तार करण्यात आला. बस्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवाशाना अपेक्षीत असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी बसस्थानकावर दोन ंठिकाणी नळही बसविण्यात आले होते. परंतु अवघ्या काही वर्षातच तेथील दोन्ही सुविधांची दुरावस्था झाली. ही सुविधा अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे तीन राज्यातून येणा:या प्रवाशांना पाण्याअभावी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकावर पहाटे पाच वाजेपासून रात्री नऊ वाजेर्पयत प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. त्यांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज  भासते. बसस्थानकाजवळ कुठलीही पाण्याची सार्वजनिक व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी केवळ बाटलीच्या  पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यांना यासाठी 20 रुपयाचा भरूदडही सहन करावा लागत आहे. या बसस्थानकावर दैनंदिन येणा:या बसेसची संख्या अन्य बसस्थानकांच्या तुलनेत सर्वाधिक असून प्रवाशांची संख्याही अधिक आहे. पाण्याच्या असुविधेला परिवहन महामंडळ जबाबदार आहेत, तेवढेच प्रवासी तथा जनतेला देखील जबाबदार धरले जात आहे. मुद्दा सार्वजनिक व्यवस्थेचा असला तरी प्रवाशांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी परिवहन महामंडळाला घ्यावी लागणार आहे. तर बसस्थानकावरील सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेत तेथील सुविधा अबाधित ठेवण्याची देखील आपण प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार तातडीने  सुविधा करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून  करण्यात येत आहे. प्रवाशांच्या या मागणीची  परिवहन महामंडळ कितपत दखल घेते, याकडे या बसस्थानकावरुन प्रवास करणा:या प्रत्येक प्रवाशांचे लक्ष लागून आहे.