शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीत जिल्ह्याचा जन्मदर काहीअंशी झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ७५४ जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा तीन टक्क्यांवर पोहोचला आहे, ...

नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात ७५४ जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा तीन टक्क्यांवर पोहोचला आहे, तर दुसरीकडे जिल्ह्याचा २१ टक्के असलेला जन्मदर हा १९ टक्क्यांवर आला आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये काेरोनाचा शिरकाव झाला होता. यातून सुरू झालेले लाॅकडाऊन अनेक बाबींमुळे त्रासदायकही ठरले. यात प्रामुख्याने नोकरी जाणे, कोरोना आजार होण्याचा मानसिक तणाव, वाढीव खर्च यामुळे अनेकांनी फॅमिली प्लॅनिंग करत मूल उशिरा जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील विवाहसोहळे पुढे ढकलेले गेले. याचा परिणाम थेट जिल्ह्यातील जन्मदरावर झाला आहे. २०२०-२०२१ या वर्षात चार हजार २८९ बालकांनी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये जन्म घेतला, तर कोरोनासह विविध आजारांनी सुमारे साडेसहा हजारपेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा मृत्युदर हा तीन टक्क्यांवर आला आहे. कोरोनामुळे कमी झालेला जन्मदर चिंतेची बाबही आहे.

विवाहसोहळे घटले

कोरोनापूर्वी जिल्ह्यात वर्षाला साधारण अडीच ते तीन हजारपेक्षा अधिक विवाहसोहळे होत होते. छोट्या-मोठ्या प्रमाणात होणारे हे साेहळे कोरोना संसर्गाच्या भीतीने कमी झाले आहेत. कारवाईच्या भीतीने अनेकजण घरगुती पद्धतीने विवाह करत आहेत, तर काहींनी उपवर मुलामुलींची विवाह काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय नाइलाजाने घेतला आहे.

जन्मदर घटला

२१.१ जन्मदर असलेल्या नंदुरबार जिल्ह्याचा जन्मदर यंदाच्या वर्षात १९ टक्के झाल्याचे सांगण्यात आले आहे. यातून कोरोना महामारीचे दुष्परिणाम गंभीर असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक केंद्रांकडून विविध सोयी गर्भवती मातांसाठी झाल्या आहेत.