शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

जिल्हाबाहेरून आलेल्यांची तपासणी नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊन चाकरमानी ही मोठ्या शहरातून गावाकडे परतत आहेत. नियामानुसार जिल्हा बाहेरील व्यक्ती गावाकडे आली तर त्याला गावातील आरोग्य केंद्रात त्याची तपासणी करून १४ दिवस होमक्वॉरंटाईन व्हावे लागते. परंतु काही नागरिक जिल्हा बाहेरून आल्यानंतरही राजरोसपने बाजारात किंवा बाहेर फिरत आहेत.या बेपर्वाहीमुळेच गेल्या सहा दिवसात ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे खेडेगावात व तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पहिल्या, दुसऱ्या, तिसºया व आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी, महसूल,पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासन जिल्ह्यात समन्वयाने व डोळ्यात तेल घालून काम करत आहे. नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा या शहरी भागात आणि बामखेडा,आष्टे, नटावद सारख्या ग्रामीण भागात सुद्धा प्रशासन कोरोनामुक्त करण्यास यश मिळाले होते. परंतु नागरिकांच्या बेफिकरिमुळे त्या आनंदावर विरजन पडले. खेडेगावात कोरोनाने आता खरा प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. म्हणून बाहेरगावाहुन व जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्तींनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आरोग्य तपासणी करून १४ दिवसांपर्यंत क्वॉरंटाईन होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील संघटनेकडून करण्यात येत आहे.