शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सततधारेमुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळंबू : सलग १५ दिवसांपासून परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिप हंगामातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबू : सलग १५ दिवसांपासून परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिप हंगामातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. हंगामातील कापूस, मका, सोयाबीन, तूर, मूग, उदीड, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या १५ दिवसापासून परिसरात सर्वत्र धो-धो सरी कोसळत असल्याने शेतातील कोळपणी, निंदणी व मशागतीची कामे खोळंबली असून, पाऊस कधी थांबेल या विवंचनेत शेतकरी पडला आहे.
जवळपास १२ ते १५ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन दुर्लभ झाले आहे. त्यामुळे कापूस, मका, सोयाबीन, तूर ही पिके सूर्यप्रकाशाअभावी पिवळी पडून लागली आहेत. दरम्यान, मूग पिकाच्या उभ्या झाडावर असलेल्या तोडणीसाठी आलेल्या परिपक्व शेगांना अती पावसाने कोंबे फुटल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.


धो -धो बरसणाऱ्या पावसामुळे शेतातील कोळपणी, निदणीची व पिकातील आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. आता पाऊस कधी थांबेल या विवंचनेत शेतकरी पडला आहे. तसेच उर्वरीत येणारे सर्व नक्षत्रे ही पावसाची असून, पावसाने उघडीप दिली तरच पिकांची वाढ चांगली होते म्हणून शेतकरी मशागतीच्या कामांसाठी आता पाऊस थांबण्याची वाट पाहात आहेत.
परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या कापूस या नकदी पिकावर मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. अती पावसाने कापूस पिकाची पाने पिवळी व लालसर होऊन गळत आहे. काही शेतात पाणी साचल्याने कापसाची झाडे ‘मर’ रोगामुळे काढून घेण्यात येत आहे. या वेळी पिके वाचविण्यासाठी महागातल्या महाग औषधांची फवारणी करूनही पिकांमध्ये सुधारणा होत नसल्याने औषधांचा खर्चही वाया जात असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. पाऊस व रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संततधारेमुळे भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे. कळंबू, ता.शहादा परिसरात लागवड केलेल्या भेंडी, गवार, टमाटे, वांगी या पिकांनाही सततच्या संततधारेमुळे मोठा फटका बसत आहे. या भाजीपाल्याची वेळेत तोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.