शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

कोरोना मृत्यूंची संख्या २०० पार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:38 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या १० महिन्यात आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्याही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या १० महिन्यात आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे.जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. राज्यात सर्वदूर कोरोना रुग्ण वाढत असताना नंदुरबारात मात्र रुग्णांची संख्या कमी होती; पण सध्या गेल्या तीन महिन्यापासून राज्यात रुग्ण कमी होत असताना जिल्ह्यात मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही इतर भागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे.          बुधवारी दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यूंची संख्या दोनशे पार झाली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज     आहे. त्यासाठी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करून नियम तोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीही जबाबदारीचे भान ठेवून नियम पाळण्याची गरज आहे.