शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

नूतनीकरणासाठी ९२ कोटींचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:47 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा ठरलेल्या शहादा-शिरपूर रस्त्याच्या पुनर्निमाणासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीसी) योजनेअंतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा ठरलेल्या शहादा-शिरपूर रस्त्याच्या पुनर्निमाणासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीसी) योजनेअंतर्गत ९२ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाठविण्यात आला आहे. या रस्त्याचे काम झाले तर अपघातांचे प्रमाण कमी होऊन त्रस्त वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील शहादा-शिरपूर रस्त्यावरील अनरदबारी ते तोरखेडा हा २२ किलोमीटरचा रस्ता वाहनचालकांसाठी आतापर्यंत मृत्यूचा सापळा ठरला आहे. दरवर्षी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी अनेकवेळा परिसरातील लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांनी वारंवार आंदोलने केली. नेहमीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आंदोलन झाल्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत असल्याने काही दिवसानंतर पुन्हा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढत असल्याने अपघातांची मालिका नित्यनियामाने सुरू असते. शहादा ते शिरपूर हे अंतर ५२ किलोमीटर असून या रस्त्यावर खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे हे अंतर पार करण्यासाठी किमान दोन तासाचा कालावधी लागत होता. त्याचप्रमाणे येथून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. या ५२ किलोमीटरपैकी अनरदबारी ते तोरखेडा हे २२ किलोमीटरचे अंतर शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येते. सर्वात जास्त खराब रस्ता याच भागात असल्याने रस्त्यांवरील खड्डे चुकविताना अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे रुंदीकरण व डागडूजी करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविण्यात आले असून नवीन कार्पेट टाकण्यात आले आहे. परिणामी ही तात्पुरती उपाययोजना असली तरी जून महिन्यापासून सुरू होणाºया पावसाळ्यात हे नूतनीकरण व दुरुस्ती किती काळ टिकेल हा संशोधनाचा विषय आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याची दुरुस्ती केली जात असली तरी त्याच्या दजार्बाबत नागरिकांमध्ये शंका उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी हे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एकीकडे वाहनचालक व नागरिक समाधान व्यक्त करीत असले तरी दुसरीकडे पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी हा रस्ता दरवर्षी तात्पुरता दुरुस्त करण्याऐवजी यावर कायमस्वरूपी उपायोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.अनरदबारी ते तोरखेडा फाटा या २२ किलोमीटर अंतरासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एशियन डेव्हलपमेंट बँक या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ९२ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यात या महामार्गाचे संपूर्ण नूतनीकरण व रुंदीकरण याचा समावेश असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या रस्त्याची निर्मिती नव्याने केली जाणार आहे. राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर पावसाळा संपल्यावर या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शहादा-शिरपूर अंतर दळणवळणासाठी वेळ वाचणार असून पर्यायाने इंधनाची बचत होणार आहे. वाहनचालकांचेही यात सातत्याने होत असणारे नुकसान थांबणार आहे. राज्य शासनामार्फत लवकरच त्याला मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आली आहे.औद्योगिक नगरींना जोडणारा महामार्गगुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्ग या नावाने ओळखला जातो. औद्योगिक नगरींना जोडणारा हा महामार्ग असल्याने सर्वाधिक अवजड वाहतूक या महामार्गावर सुरु असते. त्यातच या महामार्गावरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वाहनाच्या दुरुस्तीसह वारंवार होणाºया अपघातांमुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने या महामार्गाबाबत सातत्याने परिसरातील नागरिक व अवजड वाहन चालकांची ओरड सुरू असते. परिणाम दरवर्षी या महामार्गावरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे व मृत्यूचा सापळा यामुळे सर्वाधिक चर्चेचा हा महामार्ग ठरला आहे.या रस्त्याच्या नवनिर्मितीसाठी ९२ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला असून लवकरच त्यास मंजुरी मिळणार आहे. यामुळे या २२ किलोमीटर रस्त्याचे नव्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्मिती केली जाणार असल्याने भविष्यात या रस्त्याबाबत या तक्रारीचे प्रमाण अत्यंत अल्प असेल. सध्या या रस्त्याची दुरुस्ती केली जात आहे.-सचिन पगारे, शाखा अभियंता, सा.बां.उपविभाग, शहादा.