शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

१२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी दिवसभरात १२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी दिवसभरात १२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे़ पॉझिटिव्ह आलेल्यात नंदुरबार येथे ३४, शहादा ३६, नवापूर ३७, तळोदा ११ तर अक्कलकुवा येथील चौघांचा समावेश आहे़ बाहेरील जिल्ह्यातील दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़
कोरोनामुळे जिल्ह्यात आजवर ६५ जणांचा मृत्यू झाला आहे़ तर ९५० जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़ मंगळवारी दुपारी नंदुरबार शहरातील राजेंद्र नगर, मेहतर वस्ती, वैशाली नगर, शारदा नगर, अजय नगर, दंडपाणेश्वर कॉलनी, नेहरु नगर, अरिहंत नगर याठिकाणी प्रत्येकी एक, तुलसी विहार येथे ४ तर तालुक्यातील रनाळे येथे ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे एकाच दिवसात १७ रुग्ण आढळून आले आहेत़ तळोदा येथील खान्देशी गल्लीत २ तर गणपती गल्ली अणि श्रॉफ बाजार येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत़ शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे आणि सावखेडा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याची माहिती देण्यात आली होती़ दरम्यान रात्री उशिरा ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ यामुळे दिवसभरात १०० पेक्षा अधिक जणांचे रिपोर्ट पॉॅझिटिव्ह ठरले़
दरम्यान मंगळवारी ५० रूग्ण बरे होवून घरी परतले होते़ सकाळी तळोदा येथील सात तर दुपारी जिल्ह्यातील विविध भागातील ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले़ यातून जिल्ह्यात ८७७ रुग्ण उपचार घेत आहेत़ यात नंदुरबार येथील ३५५, शहादा २६४, तळोदा ९३, नवापूर १३०, अक्कलकुवा १२ आणि धडगाव तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे़ बाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कोविड हॉस्पिटल, एकलव्य केअर सेंटर, सलसाडी ता़ तळोदा, मोहिदा ता शहादा या शासकीय उपचार कक्षांसह नंदुरबार शहरात दोन खाजगी कोविड हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहे़


मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वाघोदा शिवारातील ८७ वर्षीय वृद्धाचा तर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रनाळे ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये २१ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत़ खांडबारा येथे १८ आणि रनाळे येथे पाच रुग्ण आढळल्याने ग्रामीण भाग हॉटस्पॉट ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ यामुळे ग्रामीण भागात उपाययोजनांना गतीची गरज आहे़