शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, २३५ योजनांची करणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST

चौकट....... सध्या एकही टँकर सुरू नाही...... पाण्याच्या उपलब्धतेमुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात टँकरची गरज भासलेली नाही. मात्र येणाऱ्या ...

चौकट.......

सध्या एकही टँकर सुरू नाही......

पाण्याच्या उपलब्धतेमुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात टँकरची गरज भासलेली नाही. मात्र येणाऱ्या दिवसात ३४ गावे आणि १४ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वेळ येऊ शकते. यासाठी मार्च महिन्याकरिता ४९ टँकरचे नियोजन करण्यात आले असून यासाठी १ कोटी १८ लाख ८० हजारांचा खर्च अपेक्षित आहे.

असा आहे कृती आराखडा....

मार्च महिन्यातील संभाव्या पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ३० कोटी ४२ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये ६०८ विंधन विहिरी, २३५ नळ योजनांची दुरुस्ती, १६९ पूरक नळ योजना, १२०२ विंधन विहिरींची दुरुस्ती तसेच ४३८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे निश्चित केले आहे.

विंधन विहिरीवर राहणार भर...

प्रशासनाने १५६ वाड्या आणि ४२७ गावांसाठी विंधन विहिरी घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी ३ कोटी ९५ लाख खर्च अपेक्षित आहे. त्याच वेळी २७९ गावे आणि ९० वाड्यांसाठी १ कोटी ७३ लाख रुपये खर्चून खासगी विंधन विहीरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून त्याद्वारे टंचाईग्रस्त भागाला पाणी पुरविण्यात येणार आहे.

४९ टँकरची लागणार गरज...

मार्च महिन्यात अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही टँकर सुरू नाही. मात्र ३१ मार्चपर्यंत काही भागात पाणीटंचाई निमार्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ३४ गावे आणि १४ वाड्यांना ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १ कोटी १८ लाख ८० हजार खर्च अपेक्षित आहे.