शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : येणाऱ्या काळात जिल्ह्यातील काही गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळेच जिल्ह्यातील विविध ...

ठळक मुद्देजिल्ह्याच्या टंचाई निवारणास प्राधान्य ; १५ आॅगस्टपर्यंतचे नियोजननांदेडसाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३० दलघमी आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात १५ दलघमी पाणी आरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येणाऱ्या काळात जिल्ह्यातील काही गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळेच जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पातील १५ आॅगस्टपर्यंत पुरेल इतके पाणी शहरी व ग्रामीण भागातील पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा कालावधी लक्षात घेऊन पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पाणी आरक्षणाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, आ. अमर राजूरकर, आ. हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. वसंत चव्हाण, आ. डॉ. तुषार राठोड, आ. विक्रम काळे, आ. प्रदीप नाईक, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार आदींसह अधिकाºयांची उपस्थिती होती.पिण्याच्या पाण्याला संपूर्ण जिल्ह्यातील प्रकल्पातील जलाशयामध्ये सर्वोच्च प्राधान्य राहील असेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. विविध जलाशयातील उपलब्ध पाणीसाठा आणि शहरी व नागरी भागासाठीची संबंधित यंत्रणांची मागणी लक्षात घेऊन पाणी आरक्षणाचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.प्रारंभी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील पाणीसाठ्याची माहिती देऊन शहरी व ग्रामीण भागासाठी पाण्याची यंत्रणांनी केलेली मागणी आदींची माहिती दिली. अवैध पाणी उपशावर नियंत्रणासाठी समित्या गठित केल्या असून कार्यवाही सुरु असल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांनी थकीत पाणीपट्टी भरण्याबाबत जिल्हा परिषदेला सूचना केली. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देवून अंमलबजावणी प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला.असे आहे प्रकल्पनिहाय पाणी आरक्षणमहानगरपालिका नांदेडसाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३० दलघमी आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात १५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले. याशिवाय जिल्हा परिषद नांदेडसाठी विष्णूपुरी प्रकल्पात २ दलघमी आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ३५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आला. याशिवाय विष्णूपुरी प्रकल्पात १.५० दलघमी पाणी एमआयडीसी नांदेडसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध नगरपालिका व ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतील पाणी आरक्षित करण्यात आले. उर्ध्व पैनगंगा, निम्नमानार बारुळ, विष्णूपुरी, पूर्णा, देवापूर या मोठ्या प्रकल्पांत एकूण ९३.१० दलघमी आणि उर्ध्व मानार लिंबोटी निम्नमानार बारुळ, कुंद्राळा, करडखेड, नागरझरी, कुदळा, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्र. ४, बाभळी बंधारा या मध्यम प्रकल्पातील १८.८० दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला तसेच पलाईगुडा, शेख फरिदवदरा, रेणापूर सुधा, सुनेगाव व उर्ध्व मानार लिंबोटी या लघु प्रकल्पांत ४.८० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री कदम यांनी जाहीर केले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरणDamधरण