शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कंधार तालुक्यातील शेतकरी बोंडअळीच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:32 IST

मागील वर्षी लागवड केलेल्या १९ हजार ५५० हेक्टरवरील कापसाला बोंडअळीचे ग्रहण लागले. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याने कापसाचा संयुक्तपणे पंचनामा अहवाल  वरिष्ठ पातळीवर पाठवून तीन महिन्यांचा कालावधी संपला.

कंधार (नांदेड ) : मागील वर्षी लागवड केलेल्या १९ हजार ५५० हेक्टरवरील कापसाला बोंडअळीचे ग्रहण लागले. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याने कापसाचा संयुक्तपणे पंचनामा अहवाल  वरिष्ठ पातळीवर पाठवून तीन महिन्यांचा कालावधी संपला.  त्यामुळे पुढील पेरणीपूर्व मशागतीला १३ कोटी २९ लाख ४० हजार नुकसान अनुदान मिळणार का? याची प्रतीक्षा ३६ हजार १२७ शेतकऱ्यांना लागली आहे.

मागील वर्षीचा खरीप हंगाम निसर्गचक्राच्या फेऱ्यात सापडला. अत्यल्प पावसाने पेरणी एका टप्प्यात पूर्ण झाली नाही. त्यात पुन्हा  पावसावर शेती पिके असल्याने अल्पश: पावसाने शिवार बहरला नाही. शेतकऱ्यांनी कोट्यवधीची गुंतवणूक केली. परंतु कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली. कापसाची वाढ-पोषण योग्य झाली नाही. बोंडअळीने ग्रासल्याने वेचणीला मजुराचा तुटवडा झाला. वेचणीचे भाव वाढले पण संपूर्ण कापूस घरी आणता आला नाही. पुन्हा बाजारात अपेक्षित भाव मिळाला नाही. पांढरे सोने आधार देईल, ही अपेक्षा फोल ठरली. 

१९ हजार ५५० हेक्टर कापसाची लागवडतालुक्यात ६३ हजार ७४१.६० हेक्टरवर खरीप पेरणी झाली होती. त्यात सोयाबीन लागवड २१ हजार ८८० हेक्टर ही सर्वाधिक होती. त्यानंतर कापूस लागवड १९ हजार ५५० हेक्टर लागवड शेतकऱ्यांनी केली. सहा महसूल मंडळांतर्गत १२३ गावांत लागवड उत्साहाने केली. कंधार महसूल मंडळांतर्गत २ हजार ८७७ हे., कुरुळा- २ हजार ३५८ हे., फुलवळ ३ हजार २३४ हे., उस्माननगर ३ हजार ६६९, बारुळ ३ हजार ९५५ व पेठवडज- ३ हजार ४५७ हे.ची समावेश होता. परंतु कापसाला बोंडअळीने फस्त केले.  नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी शेतकरी करु  लागला. ‘लोकमत’ने हा प्रश्न उजागर केला़ पाहणी व पंचनामे करतानाची जाचक बाब अडचणीची ठरु लागले. त्यात सरसकट पंचनामे मुद्या ऐरणीवर आला. राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.

महसूल, कृषी, पंचायत आदींचा संयुक्त कापूस नुकसानीविषयीचा अहवाल मोठ्या परिश्रमाने तयार करण्यात आला. १९ हजार ५५० हेक्टर जिरायती होते. ३६ हजार १२७ शेतकऱ्यांना बोंडअळीचा फटका बसला होता. जिरायतीसाठी ६ हजार ८०० प्रमाणे १३ कोटी २९ लाख ४० हजाराची नुकसान भरपाई मदत अपेक्षित धरुन डिसेंबर २०१७ ला वरिष्ठ पातळीवर अहवाल तालुका स्तरावरुन पाठविण्यात आला. तीन महिने उलटले तरी मदत अद्याप मिळाली नाही. पेरणीपूर्व (खरीप) मशागतीने आता वेग घेण्यास प्रारंभ झाला आहे. तुटपुंंजी अनुदान रक्कम आहे. त्यात वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु मिळणारी मदतही वेळेत मिळावी, अशी प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीMONEYपैसाState Governmentराज्य सरकारagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र