शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कंधार तालुक्यातील शेतकरी बोंडअळीच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:32 IST

मागील वर्षी लागवड केलेल्या १९ हजार ५५० हेक्टरवरील कापसाला बोंडअळीचे ग्रहण लागले. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याने कापसाचा संयुक्तपणे पंचनामा अहवाल  वरिष्ठ पातळीवर पाठवून तीन महिन्यांचा कालावधी संपला.

कंधार (नांदेड ) : मागील वर्षी लागवड केलेल्या १९ हजार ५५० हेक्टरवरील कापसाला बोंडअळीचे ग्रहण लागले. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याने कापसाचा संयुक्तपणे पंचनामा अहवाल  वरिष्ठ पातळीवर पाठवून तीन महिन्यांचा कालावधी संपला.  त्यामुळे पुढील पेरणीपूर्व मशागतीला १३ कोटी २९ लाख ४० हजार नुकसान अनुदान मिळणार का? याची प्रतीक्षा ३६ हजार १२७ शेतकऱ्यांना लागली आहे.

मागील वर्षीचा खरीप हंगाम निसर्गचक्राच्या फेऱ्यात सापडला. अत्यल्प पावसाने पेरणी एका टप्प्यात पूर्ण झाली नाही. त्यात पुन्हा  पावसावर शेती पिके असल्याने अल्पश: पावसाने शिवार बहरला नाही. शेतकऱ्यांनी कोट्यवधीची गुंतवणूक केली. परंतु कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली. कापसाची वाढ-पोषण योग्य झाली नाही. बोंडअळीने ग्रासल्याने वेचणीला मजुराचा तुटवडा झाला. वेचणीचे भाव वाढले पण संपूर्ण कापूस घरी आणता आला नाही. पुन्हा बाजारात अपेक्षित भाव मिळाला नाही. पांढरे सोने आधार देईल, ही अपेक्षा फोल ठरली. 

१९ हजार ५५० हेक्टर कापसाची लागवडतालुक्यात ६३ हजार ७४१.६० हेक्टरवर खरीप पेरणी झाली होती. त्यात सोयाबीन लागवड २१ हजार ८८० हेक्टर ही सर्वाधिक होती. त्यानंतर कापूस लागवड १९ हजार ५५० हेक्टर लागवड शेतकऱ्यांनी केली. सहा महसूल मंडळांतर्गत १२३ गावांत लागवड उत्साहाने केली. कंधार महसूल मंडळांतर्गत २ हजार ८७७ हे., कुरुळा- २ हजार ३५८ हे., फुलवळ ३ हजार २३४ हे., उस्माननगर ३ हजार ६६९, बारुळ ३ हजार ९५५ व पेठवडज- ३ हजार ४५७ हे.ची समावेश होता. परंतु कापसाला बोंडअळीने फस्त केले.  नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी शेतकरी करु  लागला. ‘लोकमत’ने हा प्रश्न उजागर केला़ पाहणी व पंचनामे करतानाची जाचक बाब अडचणीची ठरु लागले. त्यात सरसकट पंचनामे मुद्या ऐरणीवर आला. राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.

महसूल, कृषी, पंचायत आदींचा संयुक्त कापूस नुकसानीविषयीचा अहवाल मोठ्या परिश्रमाने तयार करण्यात आला. १९ हजार ५५० हेक्टर जिरायती होते. ३६ हजार १२७ शेतकऱ्यांना बोंडअळीचा फटका बसला होता. जिरायतीसाठी ६ हजार ८०० प्रमाणे १३ कोटी २९ लाख ४० हजाराची नुकसान भरपाई मदत अपेक्षित धरुन डिसेंबर २०१७ ला वरिष्ठ पातळीवर अहवाल तालुका स्तरावरुन पाठविण्यात आला. तीन महिने उलटले तरी मदत अद्याप मिळाली नाही. पेरणीपूर्व (खरीप) मशागतीने आता वेग घेण्यास प्रारंभ झाला आहे. तुटपुंंजी अनुदान रक्कम आहे. त्यात वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु मिळणारी मदतही वेळेत मिळावी, अशी प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीMONEYपैसाState Governmentराज्य सरकारagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र