शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

हदगाव तालुक्यात दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:06 IST

मनाठा येथील ९ वीत व सावरगाव येथील ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने किरकोळ कारणावरुन आत्महत्या केल्याच्या दोन घटना तीन दिवसांत घडल्या. दैनंदिन जीवनात मुले चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे कसे? असा प्रश्न यानिमित्ताने पालकांना पडला आहे.

हदगाव : मनाठा येथील ९ वीत व सावरगाव येथील ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने किरकोळ कारणावरुन आत्महत्या केल्याच्या दोन घटना तीन दिवसांत घडल्या. दैनंदिन जीवनात मुले चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे कसे? असा प्रश्न यानिमित्ताने पालकांना पडला आहे.मनाठा येथील यश सुनील चौरे हा ९ वीत होता. सेमीवर्गाला असल्याने त्याच्या पालकाने त्याला नांदेड येथे शिकवणी लावून खाजगी वसतिगृहात ठेवले होते. सहा महिने तो नांदेडला व्यवस्थित राहिला. दिवाळीच्या सुटीत तो गावी मनाठा येथे आला होता. सुट्या संपल्याने सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी तो नांदेड येथे वसतिगृहात गेला, मंगळवारी रात्री लगेच तो गावी आला. वसतिगृहातील अन्य मुले आली नाहीत, असे त्याने घरी सांगितले. गुरुवार, २८ रोजी सकाळी त्याचा मोठा भाऊ रजत नांदेडला कॉलेजला जात होता. रजतसोबत यशनेही जावे, असे पालकांचे म्हणणे होते.मात्र तो गेला नाही. पालकांनी त्याला जाब विचारला, याचाच राग मनात ठेवून यशने सकाळी ८.३० च्या दरम्यान स्कार्फने गळफास लावला.दुसरी घटना सावरगाव येथे घडली. अभिषेक बबन ठाकूर (वय १७) असे मयताचे नाव आहे. तो अकरावीला होता. हदगावला तो शिकायला होता. नवीन पद्धतीने (कोंबडा पद्धत) कटींग केल्याने त्याचे वडील त्याच्यावर रागावले व गावातील केशकर्तनालयात नेवून त्याची साधी कटींग केली. याचाच राग मनात ठेवून अभिषेकने ३० रोजी आईवडील शेतात गेल्याची संधी साधून राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटनांनी हदगाव तालुकावासिय हादरले. पहिल्या घटनेत मुलाच्या मनाप्रमाणे त्याला वसतिगृहात न पाठविता गावातच राहू दिले असते तर, दुसºया घटनेत पालकांनी मुलाच्या कटिंगकडे दुर्लक्ष केले असते तर दोन्ही घटना टळल्या असत्या, अशी चर्चा सुरु झाली.खेड्यातील शाळेची गुणवत्ता टिकून राहिली तर पालक त्यांच्या पाल्यांना शहराकडे पाठविणार नाहीत. गुणवत्तावाढीची जबाबदारी संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचीही नाही का ? शाळेतील शिक्षणाच्या धड्याशिवाय जीवन जगण्याचे धडे देण्याचे गुरुजी विसरले काय? कथा, कहाण्या सांगून मोठे होण्याचे स्वप्न गुरुजी विद्यार्थ्यांना पाहावयास लावत असत, ती कला सध्याचे शिक्षक विसरलेत काय? असा सवाल आहे.एकूणच पालकांनी आता या दोन्ही घटनांपासून सावध राहण्याची गरज आहे. आत्महत्या करणारा तर निघून जातो, मात्र पालकांना तो मरेपर्यंत यातना देतो, त्यामुळे पालकांनी आता मुलांसोबत प्रेमानेच बोलले पाहिजे, असे शिकावे, अशीही चर्चा सुरु आहे.मुलांना रागावण्याचाही अधिकार पालकांना नाही?या दोन्ही घटनांनी मात्र पालकवर्ग कमालीचा धास्तावला आहे. मुलांसोबत राहावे कसे ? तो चुकत असेल तर त्याला बोलूही नाही का? असे नानाविध प्रश्न यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. पोटाला चिमटा देवून ते यासाठी वाट्टेल ते करतात. स्वत:च्या गरजा कमी करुन पाल्यांना सुविधा देतात. आपल्या काळात न मिळालेल्या सुविधा, मुलांना तरी मिळाव्यात, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. असे वाटणे चुकीचे आहे का? आजचे पालकही २० ते २५ वर्षांपूर्वी विद्यार्थी होते. त्यांनीही अडचणीवर मात केली. या अडचणी मुलांना येवू नयेत, म्हणून त्यांना शहरात ठेवले जाते.गर्भ वाढवण्यासोबत तो मोठा होईपर्यंत मुलाची आई किती काळजी घेते, तिला रागावण्याचाही अधिकार मुलांनी देवू नये का ? असा सवाल पालकांचा आहे.

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीSchoolशाळा