शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

हदगाव तालुक्यात दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:06 IST

मनाठा येथील ९ वीत व सावरगाव येथील ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने किरकोळ कारणावरुन आत्महत्या केल्याच्या दोन घटना तीन दिवसांत घडल्या. दैनंदिन जीवनात मुले चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे कसे? असा प्रश्न यानिमित्ताने पालकांना पडला आहे.

हदगाव : मनाठा येथील ९ वीत व सावरगाव येथील ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने किरकोळ कारणावरुन आत्महत्या केल्याच्या दोन घटना तीन दिवसांत घडल्या. दैनंदिन जीवनात मुले चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे कसे? असा प्रश्न यानिमित्ताने पालकांना पडला आहे.मनाठा येथील यश सुनील चौरे हा ९ वीत होता. सेमीवर्गाला असल्याने त्याच्या पालकाने त्याला नांदेड येथे शिकवणी लावून खाजगी वसतिगृहात ठेवले होते. सहा महिने तो नांदेडला व्यवस्थित राहिला. दिवाळीच्या सुटीत तो गावी मनाठा येथे आला होता. सुट्या संपल्याने सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी तो नांदेड येथे वसतिगृहात गेला, मंगळवारी रात्री लगेच तो गावी आला. वसतिगृहातील अन्य मुले आली नाहीत, असे त्याने घरी सांगितले. गुरुवार, २८ रोजी सकाळी त्याचा मोठा भाऊ रजत नांदेडला कॉलेजला जात होता. रजतसोबत यशनेही जावे, असे पालकांचे म्हणणे होते.मात्र तो गेला नाही. पालकांनी त्याला जाब विचारला, याचाच राग मनात ठेवून यशने सकाळी ८.३० च्या दरम्यान स्कार्फने गळफास लावला.दुसरी घटना सावरगाव येथे घडली. अभिषेक बबन ठाकूर (वय १७) असे मयताचे नाव आहे. तो अकरावीला होता. हदगावला तो शिकायला होता. नवीन पद्धतीने (कोंबडा पद्धत) कटींग केल्याने त्याचे वडील त्याच्यावर रागावले व गावातील केशकर्तनालयात नेवून त्याची साधी कटींग केली. याचाच राग मनात ठेवून अभिषेकने ३० रोजी आईवडील शेतात गेल्याची संधी साधून राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटनांनी हदगाव तालुकावासिय हादरले. पहिल्या घटनेत मुलाच्या मनाप्रमाणे त्याला वसतिगृहात न पाठविता गावातच राहू दिले असते तर, दुसºया घटनेत पालकांनी मुलाच्या कटिंगकडे दुर्लक्ष केले असते तर दोन्ही घटना टळल्या असत्या, अशी चर्चा सुरु झाली.खेड्यातील शाळेची गुणवत्ता टिकून राहिली तर पालक त्यांच्या पाल्यांना शहराकडे पाठविणार नाहीत. गुणवत्तावाढीची जबाबदारी संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचीही नाही का ? शाळेतील शिक्षणाच्या धड्याशिवाय जीवन जगण्याचे धडे देण्याचे गुरुजी विसरले काय? कथा, कहाण्या सांगून मोठे होण्याचे स्वप्न गुरुजी विद्यार्थ्यांना पाहावयास लावत असत, ती कला सध्याचे शिक्षक विसरलेत काय? असा सवाल आहे.एकूणच पालकांनी आता या दोन्ही घटनांपासून सावध राहण्याची गरज आहे. आत्महत्या करणारा तर निघून जातो, मात्र पालकांना तो मरेपर्यंत यातना देतो, त्यामुळे पालकांनी आता मुलांसोबत प्रेमानेच बोलले पाहिजे, असे शिकावे, अशीही चर्चा सुरु आहे.मुलांना रागावण्याचाही अधिकार पालकांना नाही?या दोन्ही घटनांनी मात्र पालकवर्ग कमालीचा धास्तावला आहे. मुलांसोबत राहावे कसे ? तो चुकत असेल तर त्याला बोलूही नाही का? असे नानाविध प्रश्न यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. पोटाला चिमटा देवून ते यासाठी वाट्टेल ते करतात. स्वत:च्या गरजा कमी करुन पाल्यांना सुविधा देतात. आपल्या काळात न मिळालेल्या सुविधा, मुलांना तरी मिळाव्यात, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. असे वाटणे चुकीचे आहे का? आजचे पालकही २० ते २५ वर्षांपूर्वी विद्यार्थी होते. त्यांनीही अडचणीवर मात केली. या अडचणी मुलांना येवू नयेत, म्हणून त्यांना शहरात ठेवले जाते.गर्भ वाढवण्यासोबत तो मोठा होईपर्यंत मुलाची आई किती काळजी घेते, तिला रागावण्याचाही अधिकार मुलांनी देवू नये का ? असा सवाल पालकांचा आहे.

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीSchoolशाळा