शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

३८ दिवसांत १९ टन कांद्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागात सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला. फक्त ३८ दिवसांत ५० किसान रेल्वे सोडण्यात ...

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागात सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला. फक्त ३८ दिवसांत ५० किसान रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. नगरसूल येथून देशाच्या विविध भागांत १९,३१८ टन कांदा पोहोचविला. यातून नांदेड रेल्वे विभागास ९.२९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. किसान रेल्वेने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात आली.

नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणांहूनही किसान रेल्वे सुरू करण्याकरिता संबंधित अधिकारी प्रयत्नरत आहेत. शेतमाल वाहतूक करण्यासाठी ५० टक्के सूटचा इतर ठिकाणातील शेतकरी, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे.

कृषी क्षेत्राच्या मार्केटिंगकरता अडचणीमुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालविण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस ५ जानेवारी २०२१ ला नगरसोल येथून सोडण्यात आली. या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला, फातुहा आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चालविण्यात आलेल्या ५० किसान रेल्वेमधून देशाच्या विविध भागांत १९,३१८ टन कांदा पोहोचविला. यातून नांदेड रेल्वे विभागास ९.२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नांदेड विभागातून यावर्षी मार्च महिनाअखेरीस आणखी ५० किसान विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे उद्दिष्ट आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणांकरिता आणखी ९० किसान रेल्वेंची मागणी नोंदविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स- टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेल्वेगाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली.

दमरेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी नांदेड विभागातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातून यशस्वीपणे किसान रेल सुरू करण्याकरता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांनी किसान विशेष रेल्वेकरता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वेमंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा, तसेच नांदेड विभागातून मालवाहतूक वाढविण्यात हातभार लावावा.