शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

३८ दिवसांत १९ टन कांद्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागात सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला. फक्त ३८ दिवसांत ५० किसान रेल्वे सोडण्यात ...

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागात सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला. फक्त ३८ दिवसांत ५० किसान रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. नगरसूल येथून देशाच्या विविध भागांत १९,३१८ टन कांदा पोहोचविला. यातून नांदेड रेल्वे विभागास ९.२९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. किसान रेल्वेने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात आली.

नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणांहूनही किसान रेल्वे सुरू करण्याकरिता संबंधित अधिकारी प्रयत्नरत आहेत. शेतमाल वाहतूक करण्यासाठी ५० टक्के सूटचा इतर ठिकाणातील शेतकरी, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे.

कृषी क्षेत्राच्या मार्केटिंगकरता अडचणीमुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालविण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस ५ जानेवारी २०२१ ला नगरसोल येथून सोडण्यात आली. या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला, फातुहा आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चालविण्यात आलेल्या ५० किसान रेल्वेमधून देशाच्या विविध भागांत १९,३१८ टन कांदा पोहोचविला. यातून नांदेड रेल्वे विभागास ९.२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नांदेड विभागातून यावर्षी मार्च महिनाअखेरीस आणखी ५० किसान विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे उद्दिष्ट आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणांकरिता आणखी ९० किसान रेल्वेंची मागणी नोंदविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स- टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेल्वेगाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली.

दमरेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी नांदेड विभागातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातून यशस्वीपणे किसान रेल सुरू करण्याकरता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांनी किसान विशेष रेल्वेकरता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वेमंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा, तसेच नांदेड विभागातून मालवाहतूक वाढविण्यात हातभार लावावा.