शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

३८ दिवसांत १९ टन कांद्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागात सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला. फक्त ३८ दिवसांत ५० किसान रेल्वे सोडण्यात ...

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागात सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला. फक्त ३८ दिवसांत ५० किसान रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. नगरसूल येथून देशाच्या विविध भागांत १९,३१८ टन कांदा पोहोचविला. यातून नांदेड रेल्वे विभागास ९.२९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. किसान रेल्वेने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात आली.

नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणांहूनही किसान रेल्वे सुरू करण्याकरिता संबंधित अधिकारी प्रयत्नरत आहेत. शेतमाल वाहतूक करण्यासाठी ५० टक्के सूटचा इतर ठिकाणातील शेतकरी, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे.

कृषी क्षेत्राच्या मार्केटिंगकरता अडचणीमुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालविण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस ५ जानेवारी २०२१ ला नगरसोल येथून सोडण्यात आली. या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला, फातुहा आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चालविण्यात आलेल्या ५० किसान रेल्वेमधून देशाच्या विविध भागांत १९,३१८ टन कांदा पोहोचविला. यातून नांदेड रेल्वे विभागास ९.२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नांदेड विभागातून यावर्षी मार्च महिनाअखेरीस आणखी ५० किसान विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे उद्दिष्ट आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणांकरिता आणखी ९० किसान रेल्वेंची मागणी नोंदविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स- टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेल्वेगाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली.

दमरेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी नांदेड विभागातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातून यशस्वीपणे किसान रेल सुरू करण्याकरता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांनी किसान विशेष रेल्वेकरता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वेमंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा, तसेच नांदेड विभागातून मालवाहतूक वाढविण्यात हातभार लावावा.