शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

शिवसेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:04 IST

धनंजय मुंडे, संजय राठोड अशा प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे.

नांदेड : शिवसेनेचा वाघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे सध्या मवाळ झाले आहेत. अनेक निर्णयांत त्यांना तडजोड करण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे खूप दूर निघून गेले आहेत; परंतु अजूनही वेळ गेली नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे खरे वारसदार असाल तर शिवशक्ती-भीमशक्तीचे त्यांचे स्वप्न पूर्ण करा आणि बॅक टू पॅव्हेलियन या, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.

केंद्रीय मंत्री आठवले हे मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी आठवले म्हणाले, ‘‘धनंजय मुंडे, संजय राठोड अशा प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल; परंतु अशा प्रकरणामुळे तीन पायांचे हे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही. काँग्रेसनेही आता नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले आहे. ते कुणालाही भीक घालणार नाहीत. सत्तेत जर काँग्रेसला न्याय मिळत नसेल तर त्यांनी लगेच बाहेर पडावे. या सरकारमधून सर्वप्रथम काँग्रेसच बाहेर पडेल अशी भविष्यवाणीही आठवले यांनी केली.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन थांबले पाहिजे. एवढे दिवस अशाप्रकारे आंदोलन करणे योग्य नाही. नामांतराच्या वेळी आम्हीही आंदोलन केले होते; परंतु काही वेळेला दोन पावले मागे आलो होतो. सरकार चर्चेसाठी तयार आहे; परंतु आंदोलकांचे नेते कायदाच मागे घेण्याच्या अटीवर ठाम आहेत. त्यामुळे हा कायदा मागे घेतल्यास अशाचप्रकारे इतर कायदे मागे घेण्याची मागणी जोर धरू शकते आणि लोकशाहीसाठी हे घातक असल्याचे ते म्हणाले.

आंबेडकरी राजकारणासाठी युती आवश्यकचरिपब्लिकन ऐक्यासाठी सर्व नेते तयार होत नाहीत. मी बाळासाहेब आंबेडकरांना अनेक वेळा त्यासाठी साद घातली; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बाळासाहेबांचा वंचितचा प्रयोग चांगला होता. लोकसभेत त्यांना भरभरून मतेही मिळाली; परंतु लोकसभेत आणि विधानसभेत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. एकूण राजकीय परिस्थिती पाहता स्वत:च्या ताकदीवर निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीला युती करूनच निवडणुका लढवाव्या लागतील. त्यासाठी नव्या पिढीने सकारात्मक राजकारण करण्याची गरज असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस