शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Biyani Murder Case: घाबरु नका, गोपनीय तक्रार करा, पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:41 IST

Sanjay Biyani Murder Case: ज्या व्यावसायिक, उद्योगपती किंवा अन्य मंडळींना धमक्या आल्या असतील त्यांनी न घाबरता तक्रारी कराव्यात. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

नांदेड- व्यावसायिक संजय बियाणी यांची भर दिवसा झालेली हत्येची घटना (Sanjay Biyani Murder Case) ही मराठवाड्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच मी तातडीने नांदेडला आलो. ज्यांना कुणाला धमक्या आल्या असतील अशा मंडळींनी घाबरुन न जाता महानिरिक्षक, पोलिस अधीक्षक किंवा माझ्याकडे गोपनीय तक्रारी कराव्यात. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे आवाहन पालकमंत्री अशोकराव चव्हाण ( Ashok Chavhan) यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर, विशेष पोलिस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, एसआयटीचे प्रमुख अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासोबत बैठकीनंतर पालकमंत्री चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नागरीकांच्या मनात सुरक्षिततेची भावना रहावी यासाठी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. बियाणी यांच्या हत्येनंतर भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ज्या व्यावसायिक, उद्योगपती किंवा अन्य मंडळींना धमक्या आल्या असतील त्यांनी न घाबरता तक्रारी कराव्यात. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. हत्येमागचे कारण आणि सूत्रधार कोण? हा मूळ प्रश्न आहे. त्यामुळे आताच अंदाज व्यक्त चूकीचे होईल.

बियाणी कुटुंबियांची खाजगीत भेटपालकमंत्री चव्हाण म्हणाले, बियाणी कुटुंबियांची मी स्वता अन् विशेष पोलिस उपमहानिरिक्षक, पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक हे खाजगीत भेट घेणार आहोत. त्यांना याबाबत जी काही माहिती द्यायची आहे. त्यांनी ती द्यावी. ही भेट खाजगी स्वरुपात राहणार आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात मदत होईल.

गृहमंत्र्यांची भेट घेणारगुरुवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक यांची मुंबईत भेट घेणार आहे. या भेटीत त्यांना नांदेडातील परिस्थितीची माहिती देणार आहे. त्यावर गृहमंत्री काय तो निर्णय घेतील असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी