शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

दीड हजारांवर शेतकऱ्यांना मिळाली सौर कृषीपंप जोडणी, ६८७ शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 5:25 PM

सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने बहुतांश शेतकरी पर्यायी मार्ग म्हणून सौर वीजपंपाचा वापर करीत आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना  महिनाभरापासून मिळाली कामाला गती

नांदेड : जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जवळपास २२०० शेतकऱ्यांनी कोटेशन भरले असून त्यापैकी १५१३ शेतकऱ्यांना कृषीपंपांची जोडणी दिली आहे. तर उर्वरित ६८७ शेतकऱ्यांच्या सौर कृषीपंप जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा केला जात नसल्याने बहुतांश शेतकरी पर्यायी मार्ग म्हणून सौर वीजपंपाचा वापर करीत आहेत. त्यात सबसिडी मिळणारे सौरपंप मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून  मिळविण्यासाठी ६ हजार ९४९ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ५२ अर्ज रद्द झाले.  छाननीत वैध झालेल्या अर्जदारांपैकी २२०० शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहेत. त्यात २१५७ शेतकऱ्यांनी वेंडरची निवड केली आहे. दरम्यान, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सौरपंप उभारणीसाठी लागणारे साहित्य शेतात निर्धारित वेळेत पोहोचू शकले नव्हते. परंतु, मागील महिनाभरापासून सदर कामास गती मिळाली आहे. 

निवडलेल्या कंपन्यांना किती उद्दिष्ट?जिल्ह्यात १३ कंपन्यांपैकी सर्वाधिक ६८० लक्ष असलेल्या टाटा पॉवर सोलार कंपनीने ५६३ पंप बसविलेले आहेत. त्यानंतर सीआरआय पंप- २८८ पैकी २५९ पंप बसविले, रवींद्र एनर्जी - ८४ पैकी ३९, मुद्रा सोलार - ७७ पैकी १३, जैन एरिगेशन ४४ पैकी ४३, एल ॲण्ड टी- १९३ पैकी १०९, स्पॅन - ३९१ पैकी ३००, शक्ती - १६४ पैकी ९३, रोटोमॅग- ३५ पैकी ००, नोवास ग्रीन - १२७ पैकी ५०, क्लरो - २१ पैकी १९, रॉमेट- १८ पैकी ००, जीके एनर्जी ३१ पैकी २५ सोलार पंप.

कोरोनामुळे टाळेबंदी आणि नंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सौर पंपासाठी लागणारे साहित्य शेतात पोहोचविण्यासाठी अडचणी येत होत्या. परंतु, आता सदर कामास गती मिळाली नाही. लवकरात लवकर सोलार पंप शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न महावितरण करत आहे.   -संतोष वहाणे, अधीक्षक अभियंता, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती