शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

नायगाव परंपरागत काँग्रेसच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:30 IST

विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत भाजपला नायगावमध्ये मिळाले २० हजारांचे मताधिक्य

बी. व्ही. चव्हाण।उमरी : विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले. असे असले तरी हा मतदारसंघ नेहमी काँग्रेस व समविचारी पक्षांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून येते.नायगाव विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर नायगावसह उमरी व धर्माबाद असे तीन तालुके त्यात समाविष्ट करण्यात आले. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार वसंतराव चव्हाण हे ६ हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले. यावेळी सेनेचे उमेदवार बाबाराव एंबडवार हे मोठ्या फरकाने पराभूत झाले. विशेष उल्लेखनीय म्हणजे यावेळी राम पाटील रातोळीकर यांना भाजपाने उमेदवारी देऊ केली होती. मात्र त्यांनी ही उमेदवारी नाकारली. म्हणून अपक्ष उमेदवार वसंतराव चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यात सरळ लढत झाली. निवडून आल्यानंतर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले.मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात आ. वसंतराव चव्हाण यांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेस व राष्टÑवादी स्वतंत्र लढले. तरीही वसंतराव चव्हाण हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. यावेळी त्यांनी भाजपाचे राजेश पवार यांचा पराभव केला. यावेळच्या मोदी लाटेचा या मतदारसंघात बराच फरक जाणवला. नवखे असणाऱ्या राजेश पवारांनी येथे शेवटपर्यंत चांगलीच झुंज दिली. सलग दुसऱ्यांदा यावेळी बापूसाहेब गोरठेकरांचा पराभव झाला. त्यासोबतच काँग्रेस-राष्टÑवादीतील राजकीय वैमनस्य उफाळून आले. राष्टÑवादी काँग्रेसची भाजपाशी असलेली मैत्री उघडपणे दिसून आली. राष्टÑवादीच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपाचा प्रचार केला. असे अनेक घटक काँग्रेस उमेदवारांच्या पराभवासाठी येथे कारणीभूत ठरले. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आ. वसंतराव चव्हाण हे काँग्रेसतर्फे रिंगणात राहणार आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. भाजपाकडून राजेश पवार व मीनलताई खतगावकर ही नावे आघाडीवर आहेत. राजेश पवार यांनी गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघात संपर्क कायम ठेवला. वंचित बहुजन आघाडीकडून भावी उमेदवारीबाबत अजूनतरी कुणाचे नाव पुढे आलेले नाही. मात्र या मतदारसंघातील मतांचे जातनिहाय समीकरण लक्षात घेता लिंगायत, मनेरवारलू अथवा कोळी समाजातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. पक्षीय पातळीवर त्यादृष्टीने चाचपणी सुरू असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून मिळते आहे.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस