शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

नायगाव परंपरागत काँग्रेसच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:30 IST

विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत भाजपला नायगावमध्ये मिळाले २० हजारांचे मताधिक्य

बी. व्ही. चव्हाण।उमरी : विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले. असे असले तरी हा मतदारसंघ नेहमी काँग्रेस व समविचारी पक्षांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून येते.नायगाव विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर नायगावसह उमरी व धर्माबाद असे तीन तालुके त्यात समाविष्ट करण्यात आले. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार वसंतराव चव्हाण हे ६ हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले. यावेळी सेनेचे उमेदवार बाबाराव एंबडवार हे मोठ्या फरकाने पराभूत झाले. विशेष उल्लेखनीय म्हणजे यावेळी राम पाटील रातोळीकर यांना भाजपाने उमेदवारी देऊ केली होती. मात्र त्यांनी ही उमेदवारी नाकारली. म्हणून अपक्ष उमेदवार वसंतराव चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यात सरळ लढत झाली. निवडून आल्यानंतर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले.मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात आ. वसंतराव चव्हाण यांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेस व राष्टÑवादी स्वतंत्र लढले. तरीही वसंतराव चव्हाण हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. यावेळी त्यांनी भाजपाचे राजेश पवार यांचा पराभव केला. यावेळच्या मोदी लाटेचा या मतदारसंघात बराच फरक जाणवला. नवखे असणाऱ्या राजेश पवारांनी येथे शेवटपर्यंत चांगलीच झुंज दिली. सलग दुसऱ्यांदा यावेळी बापूसाहेब गोरठेकरांचा पराभव झाला. त्यासोबतच काँग्रेस-राष्टÑवादीतील राजकीय वैमनस्य उफाळून आले. राष्टÑवादी काँग्रेसची भाजपाशी असलेली मैत्री उघडपणे दिसून आली. राष्टÑवादीच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपाचा प्रचार केला. असे अनेक घटक काँग्रेस उमेदवारांच्या पराभवासाठी येथे कारणीभूत ठरले. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आ. वसंतराव चव्हाण हे काँग्रेसतर्फे रिंगणात राहणार आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. भाजपाकडून राजेश पवार व मीनलताई खतगावकर ही नावे आघाडीवर आहेत. राजेश पवार यांनी गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघात संपर्क कायम ठेवला. वंचित बहुजन आघाडीकडून भावी उमेदवारीबाबत अजूनतरी कुणाचे नाव पुढे आलेले नाही. मात्र या मतदारसंघातील मतांचे जातनिहाय समीकरण लक्षात घेता लिंगायत, मनेरवारलू अथवा कोळी समाजातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. पक्षीय पातळीवर त्यादृष्टीने चाचपणी सुरू असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून मिळते आहे.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस