शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नायगाव परंपरागत काँग्रेसच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:30 IST

विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत भाजपला नायगावमध्ये मिळाले २० हजारांचे मताधिक्य

बी. व्ही. चव्हाण।उमरी : विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले. असे असले तरी हा मतदारसंघ नेहमी काँग्रेस व समविचारी पक्षांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून येते.नायगाव विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर नायगावसह उमरी व धर्माबाद असे तीन तालुके त्यात समाविष्ट करण्यात आले. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार वसंतराव चव्हाण हे ६ हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले. यावेळी सेनेचे उमेदवार बाबाराव एंबडवार हे मोठ्या फरकाने पराभूत झाले. विशेष उल्लेखनीय म्हणजे यावेळी राम पाटील रातोळीकर यांना भाजपाने उमेदवारी देऊ केली होती. मात्र त्यांनी ही उमेदवारी नाकारली. म्हणून अपक्ष उमेदवार वसंतराव चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यात सरळ लढत झाली. निवडून आल्यानंतर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले.मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात आ. वसंतराव चव्हाण यांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेस व राष्टÑवादी स्वतंत्र लढले. तरीही वसंतराव चव्हाण हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. यावेळी त्यांनी भाजपाचे राजेश पवार यांचा पराभव केला. यावेळच्या मोदी लाटेचा या मतदारसंघात बराच फरक जाणवला. नवखे असणाऱ्या राजेश पवारांनी येथे शेवटपर्यंत चांगलीच झुंज दिली. सलग दुसऱ्यांदा यावेळी बापूसाहेब गोरठेकरांचा पराभव झाला. त्यासोबतच काँग्रेस-राष्टÑवादीतील राजकीय वैमनस्य उफाळून आले. राष्टÑवादी काँग्रेसची भाजपाशी असलेली मैत्री उघडपणे दिसून आली. राष्टÑवादीच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपाचा प्रचार केला. असे अनेक घटक काँग्रेस उमेदवारांच्या पराभवासाठी येथे कारणीभूत ठरले. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आ. वसंतराव चव्हाण हे काँग्रेसतर्फे रिंगणात राहणार आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. भाजपाकडून राजेश पवार व मीनलताई खतगावकर ही नावे आघाडीवर आहेत. राजेश पवार यांनी गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघात संपर्क कायम ठेवला. वंचित बहुजन आघाडीकडून भावी उमेदवारीबाबत अजूनतरी कुणाचे नाव पुढे आलेले नाही. मात्र या मतदारसंघातील मतांचे जातनिहाय समीकरण लक्षात घेता लिंगायत, मनेरवारलू अथवा कोळी समाजातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. पक्षीय पातळीवर त्यादृष्टीने चाचपणी सुरू असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून मिळते आहे.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस