शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

नांदेड जिल्ह्यात महारेशीम अभियानाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात बुधवारी रेशीम अभियान उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या वस्रोद्योग व रेशीम संचालनालयाच्या अंतर्गत रेशीम शेतीबाबत ...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात बुधवारी रेशीम अभियान उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या वस्रोद्योग व रेशीम संचालनालयाच्या अंतर्गत रेशीम शेतीबाबत जागृती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी माहितीने सुसज्ज रेशीम रथ तयार करण्यात आला आहे. रेशीम शेतीविषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी रेशीम रथासोबत रेशीम अधिकारी, तज्ज्ञ कर्मचारी विविध गावांत मार्गदर्शन करणार आहेत. रेशीम विभाग व कृषी सहायक यांच्या मदतीने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन रेशीम शेती तसेच मनरेगा, पोकरा, आत्मा यासारख्या आनुषंगिक योजना शेवटच्या पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधिताना दिले.

अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी. चलवदे, रेशीम विकास अधिकारी श्रीमती ए. व्ही. वाकुरे, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार गिरीश सर्कलवाड, सहायक लेखाधिकारी सतीश देशमुख, सहदेव वाघमोडे, प्रसाद डुबूकवाड, वरिष्ठ तांत्रिक सहायक ए.जे.कारंडे, पी.एस.देशपांडे, टी. ए.पठाण, एस.जी. हनवते, पी.यू. भंडारे, एस.पी.इंगळे, एन. वाय. कोरके, ए. एन.कुलकर्णी, के.के. मेहकरकर, गणेश नरहिरे, रावसाहेब पोहरे, संतोष निलेवार, गोपाळ धसकनवार, बाळासाहेब भराडे आदी उपस्थित होते.

रेशीम शेतीत कामाची मजुरी देणार शासन -

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना तुती लागवड व जोपासना मजुरी व साहित्य खर्चापोटी तीन वर्षांत टप्पेनिहाय २ लाख १३ हजार १० रुपये, तर कीटक संगोपनगृह बांधण्यासाठी १ लाख १३ हजार ७८० रुपये असे एकूण ३ लाख २६ हजार ७९० रुपयांचे अनुदान देण्यात येते. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, नवा मोंढा नांदेड येथे नोंदणी करावी, अथवा ०२४६२-२८४२९१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.