शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने पीक गेलं, डोकावरचे कर्ज कसे फिटेल; विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:40 IST

या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

- गोविंद टेकाळेअर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील धामदरी येथील ३५ वर्षिय शेतकऱ्याने अतिवृष्टीने पिके वाहून गेल्याने उत्पन्न काहीच नाही मिळणार, आता कर्जकडे फेडायचे या विवंचनेत कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान दि.२२ सप्टेंबर सोमवार रोजी या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील तरूण शेतकरी तातेराव भीमराव कदम वय ३५ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तातेराव कदम हे मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. या वर्षी सुद्धा त्यांच्या दोन हेक्टर शेतात अतिवृष्टीने पीक वाहून गेल्याने काहीच उत्पन्न हाती येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचा डोंगर वाढत होता. यातच मुलांच्या शिक्षणाच्या खर्च, घराचा उदरनिर्वाह कसा करायचा या विचारात ते असत. नापिकी आणि कर्ज यामुळे तातेराव पूर्णतः खचले होते. यातच रविवारी रात्री त्यांनी आपल्या राहत्या घरी छताच्या लोखंडी कडीला दस्तीने गळफास लावून आत्महत्या केली. 

या प्रकरणी साहेब कदम यांच्या माहितीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पप्पू चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडfarmer suicideशेतकरी आत्महत्या