शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पडीत माळरानावर फळबाग फुलवून घेतले विक्रिमी उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 11:49 IST

यशकथा : मौजे बाबूळगाव (ता. कंधार, जि. नांदेड) येथील शेतकरी कैलास अर्जुनराव भंगारे यांनी पडीत, उजाड माळरानावर मोठ्या महेनतीने फळबाग फुलवून विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

- प्रकाश गिते (बहाद्दरपुरा, जि.नांदेड)

मौजे बाबूळगाव (ता. कंधार, जि. नांदेड) येथील शेतकरी कैलास अर्जुनराव भंगारे यांनी पडीत, उजाड माळरानावर मोठ्या महेनतीने फळबाग फुलवून विक्रमी उत्पन्न घेतले आहे. तीन उलभ्यात पपईचे एकूण १३ लाख ५० हजार लाखांचे उत्पन्न मिळविले. सध्या पपई तोडणीस आली आहे. यातून त्यांना अंदाजित ६ लाखांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.

सन २००० मध्ये कैलास भंगारे यांनी पडीत माळरान असलेली ३ एकर जमीन खरेदी केली व ती जेसीबीच्या साहाय्याने उकरून लागवडी योग्य केली. काही दिवस त्यांनी या जमिनीवर पावसाच्या विश्वासावर पारंपरिक शेती कसली. मात्र, निसर्गाचा सतत लहरीपणा व वेळेवर पाऊस न येणे किंवा जास्त बरसणे, यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती झाली. सन २००९ मध्ये त्यांनी घरासमोर बोअर खोदला. सुदैवाने बोअरला चांगले पाणीही लागले. घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या माळरानावरील शेतीत पाईपलाईन करून सन २०१३ मध्ये पुणे येथून ‘तायवाण-७८६ या पपईच्या बियाणे खरेदी केले.

६० दिवसांनंतर ६० आर क्षेत्रात ५ बाय ६ या अंतराने ११०० रोपाची लागवड केली. पाण्याचे व लागणारे घटक द्रव्य नियोजनबद्द नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रिप ठिबक सिंचनाने काटेकोरपणे पाण्याचा वापर करून ९ महिन्यांनंतर पपई तोडणीस सुरुवात केली. पहिल्याच तोडणीत त्यांना ५ लाखांचे उत्पन्न मिळाले तर पूर्णपणे तोड्याचे ७.५० लाखांचे उत्पन्न मिळाले. याप्रमाणे सतत तीन वेळेस पपईचे उत्पन्न घेतले. दोन वेळात १३.५० लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले, तर खर्च ३ लाख ५० हजार रुपये झाल्याचे भंगारे यांनी सांगितले.  

सध्याचा उलथा हा जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या लागवडीचा तोड १५ दिवसांत सुरुवात होईल व त्यातून ६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. ६० आर क्षेत्रात ११०० झाडे यातून प्रत्येक झाडाला ९० ते १०० फळे आहेत. प्रत्येक फळ आजघडीला १.५० ते २ किलो वजनाचे आहे. पपईला आज किमान १८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. यानुसार ६ लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, असा विश्वास भंगारे यांनी व्यक्त केला. तीन वेळेस एकूण १९.५० लाखांचे उत्पन्न, तर खर्च ५ लाख ५० हजार आहे. याचाच अर्थ असा की, त्यांना खर्च वजा जाता सरासरी १४ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

याकामी कैलास भंगारे यांना त्यांचे थोरले बंधू बाबूराव अर्जुन भंगारे यांचे मोलाचे मार्गदर्शन व मदत असल्याचे आवर्जून सांगितले. कैलास भंगारे यांनी साधारण माळरान जमिनीवर दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून, इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. सर्वसाधारण शेतजमिनीवर ते लाखो रुपये उत्पन्न मिळवित असतील तर इतरांना ते का जमू नये, असा सवाल आहे. शेती ही फायद्याचीच आहे. फक्त तिच्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfruitsफळे