शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये गोदावरी शुद्धीकरण कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 09:48 IST

हजारो माशांच्या हत्याकांडाला जबाबदार कोण?

ठळक मुद्देनांदेडमध्ये गोदावरी शुद्धीकरणाचे १४ कोटी पाण्यातशुद्धीकरणासाठी नव्याने ७७ कोटींचा प्रस्ताव

- अनुराग पोवळे

नांदेड : गोदावरीकाठी हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. २००८ पासून जवळपास १४ कोटी रुपये खर्चूनही गोदावरी नदीचे शुद्धीकरण केवळ कागदावर राहिले आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रकल्प बंदच असल्याने हे पाणी दररोज विनाप्रक्रीेया गोदेच्या पात्रात सोडले जात आहे. हजारो माशांच्या या हत्याकांडाला जबाबदार कोण, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे. 

नांदेडमधून वाहणा-या गोदावरी नदीत शहरातून जवळपास १८ नाले मिसळतात़  या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या १३ कोटींच्या निधीतून १९९९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून गोदावरी नदी शुद्धीकरणाच्या प्रकल्पास प्रारंभ करण्यात आला़ बोंढार येथे ११० एकर जागेवर मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला.  नाल्यांचे पाणी देगलूरनाका येथील पंपगृहापर्यंत आणून ते या केंद्रात पोहोचविणे अपेक्षित होते़ २००८ मध्ये ही योजना पूर्ण झाली़, तरी त्याचा वापर मात्र झाला नाही़ २००८ ते २०१७ पर्यंत या योजनेकडे कोणीही पाहिले नाही. या १३ कोटींच्या योजनेला महापालिकेने २०१७साली पुन्हा ५५ लाख खर्चून कार्यान्वित केले़ त्यामध्ये पंपगृहात ३०० एचपीचे दोन पंप आणि १५० एचपीचे १ पंप खरेदी करण्यात आला. शहरातील १८ नाल्यांचे पाणी थेट बोंढार जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आले. २०१७मध्ये केवळ सहा महिने हा प्रकल्प चालला. त्यानंतर त्याकडे पुन्हा कोणीच पाहिले नाही.

१३ कोटी ५५ लाख रुपये पाण्यात गेल्यानंतर महापालिकेने २०१८ मध्ये गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी २२ कोटी ६७ लाख रुपयांचा अहवाल पर्यावरण विभागाकडे पाठवला. तो शासनाकडून परत पाठवण्यात आला़ त्यामुळे २०१९ मध्ये पालिकेडून पुन्हा ७७ कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला़ हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यातील पहिल्या टप्प्याचे १७ कोटी रुपये महापालिकेला मिळालेदेखील आहेत. आता या १७ कोटींतून चुनाल नाला येथे उभारण्यात येणाºया मलशुद्धीकरण केंद्राचे काम केले जाणार आहे. कार्यारंभ आदेशानंतरही अद्याप हे काम सुरू झालेले नाही.प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीसगोदावरी नदीचे वाढते प्रदूषण पाहून २०१८ मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडेच होते़ सांडपाण्यामुळे गोदावरीतील पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे़ याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना मंडळाकडून महापालिकेला देण्यात आली होती़ फक्त काही दिवस नदीत मिसळणारे नाले बंद करण्यात आले एवढेच.

प्रशासकीय अनास्था कारणीभूतगोदावरीच्या आज झालेल्या दूरवस्थेसाठी प्रशासकीय अनास्था कारणीभूत ठरली आहे़ नांदेडमध्ये मी असताना गोदावरी शुद्धीकरणासाठी अनेक मोहीमा राबविल्या़ त्याला जनप्रतिसाद मिळाला़ प्रशासकीय पातळीवर मात्र हा विषय दुर्लक्षितच राहिला़ त्यामुळे गोदावरी प्रदूषितच राहिली आहे़ शुद्धीकरणाचे कोट्यवधीचे प्रस्ताव मात्र कागदावरच आहेत- डॉ़श्रीनिवास औंधकर, संचालक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ केंद्र, औरंगाबादनदीच्या शुद्धतेची जबाबदारी सर्वांचीच नागरीकरणामुळे नद्यांना अडवण्यात आले आहे. प्रदूषणाचे अनेक घटक नदीत मिसळले जात आहेत. गोदावरीचेही तेच होत आहे.  नदी शुद्ध करण्याची जबाबदारी एकट्या महापालिकेचीच नसून निसर्ग रक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.-डॉ़ए़एऩ कुलकर्णी, पर्यावरण तज्ञ तथा पक्षीप्रेमी़पैसे खर्चूनही हाती काहीच लागले नाही१३ कोटींच्या योजनेअंतर्गत करण्यात आलेले काम सदोष होते़ त्यामुळे योजनेची हेतूप्रमाणे अंमलबजावणी झालीच नाही़ महापालिकेने ५५ लाख खर्च करुन योजनेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला़ परंतु, योजनेअंतर्गत टाकलेल्या जलवाहिन्या अतिशय कमी व्यासाच्या होत्या़ त्यामुळे या योजनेतून हाती काहीच लागले नाही, असेच म्हणावे लागेल़- विलास भोसीकर, उपायुक्त (विकास), महापालिका नांदेड पाणी व मृत माशांच्या नमुन्यांचे अहवाल आज येणारगोदावरी नदीमध्ये नगीनाघाट भागात हजारो मासे मृत्यूमुखी पडल्यानंतर शनिवारी महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरी नदीचे पाणी आणि मृत माशांचे नमुने घेतले होते़ त्याचो अहवाल सोमवारी दुपारपर्यंत प्राप्त होतील़ त्यानंतर माशांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे मनपाचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़रईसोद्दीन यांनी सांगितले़ 

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण