- अनुराग पोवळे
नांदेड : गोदावरीकाठी हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. २००८ पासून जवळपास १४ कोटी रुपये खर्चूनही गोदावरी नदीचे शुद्धीकरण केवळ कागदावर राहिले आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रकल्प बंदच असल्याने हे पाणी दररोज विनाप्रक्रीेया गोदेच्या पात्रात सोडले जात आहे. हजारो माशांच्या या हत्याकांडाला जबाबदार कोण, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.
नांदेडमधून वाहणा-या गोदावरी नदीत शहरातून जवळपास १८ नाले मिसळतात़ या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या १३ कोटींच्या निधीतून १९९९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून गोदावरी नदी शुद्धीकरणाच्या प्रकल्पास प्रारंभ करण्यात आला़ बोंढार येथे ११० एकर जागेवर मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. नाल्यांचे पाणी देगलूरनाका येथील पंपगृहापर्यंत आणून ते या केंद्रात पोहोचविणे अपेक्षित होते़ २००८ मध्ये ही योजना पूर्ण झाली़, तरी त्याचा वापर मात्र झाला नाही़ २००८ ते २०१७ पर्यंत या योजनेकडे कोणीही पाहिले नाही. या १३ कोटींच्या योजनेला महापालिकेने २०१७साली पुन्हा ५५ लाख खर्चून कार्यान्वित केले़ त्यामध्ये पंपगृहात ३०० एचपीचे दोन पंप आणि १५० एचपीचे १ पंप खरेदी करण्यात आला. शहरातील १८ नाल्यांचे पाणी थेट बोंढार जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आले. २०१७मध्ये केवळ सहा महिने हा प्रकल्प चालला. त्यानंतर त्याकडे पुन्हा कोणीच पाहिले नाही.
१३ कोटी ५५ लाख रुपये पाण्यात गेल्यानंतर महापालिकेने २०१८ मध्ये गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी २२ कोटी ६७ लाख रुपयांचा अहवाल पर्यावरण विभागाकडे पाठवला. तो शासनाकडून परत पाठवण्यात आला़ त्यामुळे २०१९ मध्ये पालिकेडून पुन्हा ७७ कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला़ हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यातील पहिल्या टप्प्याचे १७ कोटी रुपये महापालिकेला मिळालेदेखील आहेत. आता या १७ कोटींतून चुनाल नाला येथे उभारण्यात येणाºया मलशुद्धीकरण केंद्राचे काम केले जाणार आहे. कार्यारंभ आदेशानंतरही अद्याप हे काम सुरू झालेले नाही.प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीसगोदावरी नदीचे वाढते प्रदूषण पाहून २०१८ मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडेच होते़ सांडपाण्यामुळे गोदावरीतील पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे़ याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना मंडळाकडून महापालिकेला देण्यात आली होती़ फक्त काही दिवस नदीत मिसळणारे नाले बंद करण्यात आले एवढेच.