शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Drought In Marathwada : परतीचा पाऊस गुल: दुष्काळी बनला माहोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:26 IST

दुष्काळवाडा : रान हिरवे दिसलं पण पीकाना अन्नद्रव्ये मिळाली नाहीत,वाढ झाली नाही. त्यामुळे पीक उतारा प्रचंड घसरण झाली.

- गंगाधर तोगरे, चिखलभोसी ता.कंधार. जि.नांदेड.

खरीप हंगामातील पिकांना परतीचा पाऊस पोषक असतो.हातातोंडाशी आलेला घास घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरतो.परंतू परतीचा पाऊस गुल झाला.आणि खरीप हंगामातील पीकांना दुष्काळात ढकलून दिला.त्यामुळे रान हिरवे दिसलं पण पीकाना अन्नद्रव्ये मिळाली नाहीत,वाढ झाली नाही. त्यामुळे पीक उतारा प्रचंड घसरण झाली. आणि सलग दुसरे वर्ष ही दुष्काळाचा सामना करण्याचा प्रंसग शेतकऱ्यावर आला आहे.

जून महिन्यात पावसाने हजेरी लावली.वेळेत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.गत वर्षीच्या दुष्काळाने होरपळून गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा वाटला.परंतु हा आंनद जास्त काळ टिकला नाही. कांही खंडानंतर होत असलेला पाऊस, वातावरणातील होणारे बदल,पीकावर होणारा रोगाचा प्रादुर्भाव आदीने शेतकरी आर्थिक गर्तेत रूतत गेला.परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दुहेरी लाभ झाला असता.खरीप पीके बहरली असती.आणि रब्बी हंगाम जोमात आला असता.पण असे घडले नाही. खरीप ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर,मुग,उडीद,आदी पीकावर परीणाम प्रभावी झाला. आर्थिक घडी पूर्णत: विस्कटून गेली.

तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८३३ मि.मी.आहे. पण सरासरी एवढा पाऊस झाला नाही.तसे परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पीक उत्पादकता घटली.पावसाळ्यात उन्हाळा व हिवाळ्यात सुद्धा उन्हाळा अशी गत झाली. कडक उन्हामुळे पीके करपू लागली.व जमीनीला भेगा वेगाने पडू लागल्या. खरीप पेरणीपूर्व मशागत, पेरणी, निंदणी,फवारणी, खूरपणी, काढणी, वेचणी, खत आदीवर होणारा खर्च निघत नाही.सोयाबीनचा उतारा निमा घटत आहे.कापूस किमान तीन भार वेचणीचा असतो.परंतु एका वेळची वेचणी व्यवस्थित होणार की नाही याचा नेम नाही.बोंडअळीचा बिमोड करताना कृषी विभागाने बांधावर जाण्यासाठी कसर ठेवली नव्हती. ता.कृषी अधिकारी आर.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी बैनाडे, कृषी सहायक शिवाजी सुर्यवंशी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार यांनी शेतकऱ्यांना मोठे सहकार्य केले.

शेतकऱ्यांनी खरीपाची मशागत, संगोपन, श्रम,करूनही निराशा झाली.तरीही शेतकरी हार मानत नाही. हाळद लागवडीतून कमाई करण्याचा प्रयत्न चालविला आहे.परंतु हाळदीला कंदमाशी तळाला लागल्याने भलतीच पंचाईत झाली आहे. एकरी हळदीवर ७५ हजार खर्च करूनही'  हळद रूसली कंदमाशीत रूतली' अशी गत झाली आहे.हळदीचे उत्पन्न निमे होण्याचा धोका निर्माण झाला आहे.पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा होणे गरजेचे आहे.परंतु त्याचा लपंडाव हा अडचणीचा ठरत आहे.रात्री अपरात्री पाणी पीकाला देण्यासाठी जीव मुठीत धरण्याचा प्रसंग आला आहे. चिखलभोसी व परीसरात कापूस, सोयाबीन, मुग, उडीद पीकाचा उतारा घसरण मोठी आहे. अशीच स्थिती तालुक्याची आहे.तात्काळ पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी ऐरणीवर आली आहे.

उत्पन्न ४० टक्के घसरले चिखलभोसी, परिसर व तालुक्यात खरीपातील कापसाला बोंडअळीतून बाहेर काढण्यात यश आले.पण परतीच्या पावसाने दगा दिला.एकाच वेचणीवर कापुस आजघडीला आहे.खालच्या बोंडाला कापूस फूटला आहे.परंतु वरची बोंडे मात्र  शाश्वती न देणारे आहेत. उत्पन्न ४० टक्के घसरण्याची शक्यता आहे.तूर तर चिंताजनक आहे. - आर.एम.देशमुख, ता.कृषी अधिकारी, कंधार.

बळीराजा काय म्हणतो?

- यंदा खरीप पीकाची निसगार्ने पूरती वाट लावली आहे.सोयाबीन पीकाला एकरी तेरा ते चौदा हजार खर्च आला.परंतू खर्चाच्या अर्धे निघत आहे.शेती कशी करावी.असा प्रश्न आहे.शासन मात्र दुष्काळ जाहीर करण्यासाठी उत्पादकता काढण्यासाठी प्रयोग करत आहे.ही शेतकऱ्यांची चेष्टा नव्हे का? -रावसाहेब शंकर वरपडे. शेतकरी

- खरीप हंगाम सतत शेतकऱ्यांना दगा देत आहे.त्यामुळे  हाळद लागवड प्रयोग केला.मी वाटयाची शेती केली आहे.75 हजार लागवड खर्च  केला.परंतु कंदमाशीने झोप उडविली आहे.बुड रोगाने पोखरून टाकले आहे.शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून दिलासा दयावा - संतोष दादाराव वरपडे, वाटेकरी शेतकरी

- गाव खरीप शेतीवर अधिक अवलंबून आहे.पण निसर्ग पावसाच्या खेळाने शेतीचा खेळ खंडोबा होत आहे.थोडीशी शेती भिजवून आधार मिळवायला भारनियमन भार पेलवत नाही.यातून मार्ग काढावा. - आनंदा विठ्ठलराव निळेगावे, शेतकरी.

- पांढरे सोने म्हणून कापसाला शेतकरी जीवापाड जपतो.निसर्ग लहरीपणा या सोन्याच्या मानगुटीवर बसला आहे.बोंडअळी ,लाल्या व परतीचा पाऊस पडला नाही.त्यामुळे एक वेळची वेचणी खर्च सुद्धा निघू देणार नाही. हे वास्तव आहे. दुष्काळ जाहीर करारला मुहूर्त कोणता आहे.हाच प्रश्न आहे - शिवराज संभाजी किडे.शेतकरी.

- खरीपाची कसर रब्बी हंगामात काढण्याचा प्रयत्न शेतकरी करतो.पण जलसाठे नाहीत.त्यामुळे रब्बी हंगाम अडचणीत अडकला आहे.दुष्काळाचे भयावह चित्र आहे.शासनाने दुष्काळ जाहीर करावा -मुरलीधर शंकर किडे.शेतकरी.

- मागील वर्षी दुष्काळी चटक्याने शेती व्यवसाय तोटयात आला.त्यामुळे तीन एकर शेती वहीताखाली आणली नाही.शेतकरी हा निसर्ग लहरीत,भारनियमन, व शासन मदतीच्या उदासीनता यात अडकला आहे. दुष्काळ जाहीर करून सावरण्याची गरज आहे. - जयवंत किडे सरपंच तथा शेतकरी

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र