शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Drought In Marathwada : सगळा उन्हाळा झालायं; उमरी तालुका दुष्काळाच्या तडाख्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 15:51 IST

दुष्काळवाडा : उमरी तालुक्यात आभाळमाया दूरावली आणि शेतकऱ्यांसह हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाना हलाखीच जगणं नशिबी आलं.

- बी. व्ही. चव्हाण, उमरी, जि. नांदेड 

महागमोलाचं बी, खत घेऊन पेरलं. बेभरवशी पावसाने नेमक्यावेळी पाठ फिरवली. कापूस उभाच वाळून गेला अन पल्हाट्या शिल्लक राहिल्या. फुलोऱ्यावर आलेले सोयबीनने माना टाकल्या. शेंगा लागल्याच नाहीत. पावसाविना बी-बियाणे, खताचा खर्च दूरच मशागतीचा खर्चही हाती लागला नाही. सगळा उन्हाळा झालाय. हे बोल आहेत, उमरी तालुक्यातील सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचे. निसर्गाच्या रोषाबरोबर त्यांना राजकीय इच्छाशक्तीचा दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेली इथली माणसं येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत जगत आहेत. 

उमरी तालुक्यात आभाळमाया दूरावली आणि शेतकऱ्यांसह हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाना हलाखीच जगणं नशिबी आलं. त्यामुळेच या तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र तेलंगणाची सीमा असलेला हा भाग. सीमेलगत असलेल्या बोथी, तुराटी गावातील लोकाचं समजून घेण्यासाठी पोहोचलो. गावातील स्थिती दयनीय. माणसं  बोलू लागली. अगोदर पावसाचे प्रमाण मुबलक असे. त्यामुळे खरीप हंगाम गेल्यानंतर रबी हंगाम बऱ्यापैकी होई. चारा वैरणावर जनावरांचे पोषण होई. दूभत्या जनावरांमुळे येणाऱ्या पैशातून संसाराचा गाडा चाले. आता सगळे संपल्यातच जमा आहे.

पावसाळा सुरू होतो न होतो, तोच पाऊस पाठ फिरवतो. आॅक्टोबर-नोव्हेंबरमधला परतीचा पाऊस फिरकतही नाही. खर्च करून पेरणी करायची. पण, पाण्याअभावी मशागतीचा खर्चही निघत नाही. उभी वाळून गेली. निसर्गाचा दुष्काळ आम्ही समजू शकतो. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा दुष्काळही आमच्याच वाट्याला का यावा हे समजत नाही, ही त्यांची व्यथा.  उमरी तालुक्याला इसापूर धरणाचे पाणी येत असले तरी तेही निसर्गावरच अवलंबून आहे. 

तुराटी गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर  तेलंगणाची सीमा आहे. तेलंगणामध्ये तेथील सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. त्या तुलनेत उमरी तालुक्यातील चित्र उलटच. उमरी या तालुक्याच्या गावाहून तुराटीपर्यतच्या १८ ते २० किमी अंतराला दोन तास लागतात. ही अवस्था गेल्या पन्नास वर्षापासून कायम आहे. 

बळीराजा काय म्हणतो?

गावात कापसाला पिशवीमागे अर्धा क्विंटलचा उतारा आला. सोयाबीनचे पीक आलेच नाही. आता पुढच्या हंगामापर्यंत जनावरे आणि घरची परिस्थिती कशी हाताळायची? घरात कुणी आजारी पडलं तर त्यांचा  औषध  पाण्याचा खर्च कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.- मुकुंदराव सावंत, तुराटी

डोंगर माथ्यावर असलेल्या या भागात अनेक वर्षांपासून आमदार, खासदार कुणीही तोंड दाखवल नाही. तहसीलदार, बीडीओ , कृषी अधिकारी येत नाहीत. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ आम्हाला होत नाही. सध्या दुष्काळ परिस्थितीमुळे आणि तुराटी येथील शेतकरी आत्महत्येच्या घटनेमुळे अनेक पुढारी इकडे भेटी देत आहेत. निदान आतातरी चोवीस तास वीजपुरवठा देऊन उपकार करावेत . - पिराजी मुडलोड 

शासनाने या भागाला कोरडवाहू गावे म्हणून मान्यता द्यावी. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना सहभागिता तत्वावर जलसंधारणाची कामे देण्यात यावी. मागेल त्याला विहीर देण्यात यावी. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आवश्यक आहे. त्यासाठी डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना बँकेकडून पीककर्ज देण्यासाठी प्राधान्य दिले जावे.- गोविंद बजाज, कृषी पदवीधारक, बोथी.

उमरीपासून दूर असल्याने बोथी-तुराटी गावांच्या परिसराला स्वतंत्र महसूल मंडळाचा दर्जा देऊन तीव्र दुष्काळग्रस्त जाहीर करावे. त्या संदर्भाने सर्व सवलती व लाभाच्या योजना शेतकरी, मजुरदार व त्यांच्या कुटुंबियासाठी द्याव्यात. जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय करावी. -लक्ष्मणराव सावंत, तुराटी

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीFarmerशेतकरी