शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मजुरांअभावी शेती आली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:40 AM

मजुरांची चणचण भासत असल्याने शेतीतील कामे थांबली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणी करावी लागते़

ठळक मुद्देशेतीकामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल

अर्धापूर/ पार्डी : मजुरांची चणचण भासत असल्याने शेतीतील कामे थांबली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणी करावी लागते़ तसेच पिकांची कापणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे़ यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना अच्छे दिन आले आहेत़अर्धापूर तालुक्यात गतवर्षात पावसाळा सरासरीपेक्षा कमी झाल्याने नदी, नाले, बोअर व विहीर थोड्याफार प्रमाणात पाण्याने भरले होते व इसापूर धरणातून पाच पाणीपाळ्या मिळत असल्याने शेतकºयांनी केळी पिकाला बगल देऊन हळद, ऊस, हरभरा, गहू व ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती़ तसेच या पिकासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने ही पिके जोमात आली़ यामधील हळद, हरभरा व गहू पिके फेब्रुवारी महिन्यात काढणीस आली़मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतीतील कामे लवकर करण्यासाठी मजुरांची मनधरणी करावी लागत आहे़ अर्धापूर तालुक्यात निमगाव, चोरंबा, कारवाडी, देळूब, शेणी, पार्डी, लहान, लोण या परिसरात हळद, गहू व हरभरा हे पिके जास्त मुबलक प्रमाणात आले आहेत़ त्यासाठी मजूरदार जास्त लागत आहेत़ पण ग्रामीण भागात कामगार वर्गाचे प्रमाण कमी झाल्याने शेतीतील कामात अनेक अडचणी निर्माण होत आहेत़ प्रामुख्याने शेती कामासाठी महिला वर्गाची आवश्यकता असते़ परंतु कालांतराने महिला मजुरांची कमी-कमी होत आहेत़ ग्रामीण भागातील महिला पुरुषाच्या खाद्यास खांदा लावून शिक्षणाच्या प्रवाहात जात आहे़ ग्रामीण भागातील महिला शिक्षण घेऊन लहान मोठे व्यवसाय करीत आहेत़ तसेच शिक्षण घेऊन नोकरीत आहेत़ यामुळे ग्रामीण भागात महिला मजूर मिळणे अशक्य झाले आहे़सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकºयांनी मजुरांची मजुरी वाढवली आहे़ महिला मजुरांना १०० ते १५० रुपये दिले जात आहे़ तर पुरुषांच्या मजुरीतसुद्धा वाढ झाली आहे़ पुरुष मजुरांना २०० ते २५० रुपये मजुरी देण्यात येत आहे़ गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात मजुरीत वाढ झाली आहे़ तरी पण मजुरांची कमतरता भासत आहे़ हळद काढणीसाठी १५ ते २० मजूर लागतात व मजुरांना १० ते १५ दिवस अगोदर सांगावे लागत आहे़ तरीसुद्धा कामगार निळत नसल्याचे चित्र दिसत आहे़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी