शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

भोकर तालुक्यातील ५४ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST

भोकर : सततची नापिकी व नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील तब्बल ५५ हजार ५७८ शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी ...

भोकर : सततची नापिकी व नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील तब्बल ५५ हजार ५७८ शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी रुपये २ कोटी १ लाख ८८ हजार ९२० एवढी रक्कम भरली होती; परंतु पीक विमा कंपनीने केवळ १ हजार ४९५ शेतकऱ्यांनाच विमा मंजूर केला. पीक विमा कंपनी व केंद्र सरकारच्या तकलादू धोरणामुळे अतिवृटीची झळ सोसलेल्या तब्बल ५४ हजार ८३ शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यापासून वंचित रहावे लागले. याबाबत बाजार समितीचे संचालक रामचंद्र मुसळे यांनी शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळण्याची मागणी केली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा सा.बां.मंत्री व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२० मध्ये भोकर तालुक्यातील ५५ हजार ५७८ शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांना तब्बल २ कोटी १ लाख ८८ हजार ९२० रुपयांचे विमा संरक्षण दिले होते. त्यानंतर तालुक्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे ७२ तासांच्या आत पीक विमा काढलेली पावती विमा कंपनीच्या वेबसाईटवर १४ ते २३ सप्टेंबरदरम्यान अपलोड करणे किंवा टोल फ्री क्रमांकावर नुकसानीची नोंदणी करण्याचे नव्याने नियम जाहीर केले. मात्र, सदरील कंपनीची साईट दिलेल्या मुदतीत सतत व्यस्त राहिल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. यामुळे विमा भरलेले; परंतु नोंदणी न केलेले तब्बल ५४ हजार ८३ शेतकरी पीक विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे रामचंद्र मुसळे यांनी सांगितले.