शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

यादव कोहचाडेला चार वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:25 IST

नागपूर विद्यापीठाच्या बहुचर्चित गुणवाढ घोटाळ्यात नाव येऊ न देण्यासाठी एका फौजदाराला सात लाख रुपयांची लाच देण्याचे प्रकरण सिद्ध झाल्याने,

 गुणवाढ घोटाळा : फौजदाराला सात लाखांची लाच देण्याचे प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या बहुचर्चित गुणवाढ घोटाळ्यात नाव येऊ न देण्यासाठी एका फौजदाराला सात लाख रुपयांची लाच देण्याचे प्रकरण सिद्ध झाल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने नागपूर विद्यापीठाचा बडतर्फ सहायक कुलसचिव आरोपी यादव नत्थोबा कोहचाडे याला ४ वर्षे कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. १९९९-२००० मध्ये नागपूर विद्यापीठात गुणवाढ, पुनर्मूल्यांकन, बनावट गुणपत्रिका आणि बनावट डिग्रीचे प्रकरण गाजले होते. याप्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हेही दाखल करण्यात आले होते आणि अटकसत्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. या घोटाळ्याचा तपास सीताबर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अनिल लोखंडे हे करीत होते. प्रत्यक्षात या घोटाळ्याचा सूत्रधार यादव कोहचाडे होता आणि तो हा घोटाळा आपला खास दलाल बंटी उके याच्यामार्फत करीत होता. या रॅकेटचा छडा फौजदार लोखंडे यांना लागला होता. त्यामुळे त्यांनी १८ जून १९९९ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास बंटीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. याबाबत कोहचाडे याला समजताच त्याचे धाबे दणाणले होते. बंटी हा त्या दिवशी पोलीस ठाण्यात हजर झाला होता. काही वेळानंतर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास यादव कोहचाडे याने फौजदार अनिल लोखंडे यांना फोन करून परस्पर भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. रहाटे कॉलनी चौकात भेटण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे कोहचाडे याने लोखंडे यांची भेट घेतली होती. बंटी उके याला चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात येऊ नये, पुनर्मूल्यांकन आणि गुणवाढ प्रकरणात आपले नाव येऊ नये, विशालक्ष्मीचे नाव वगळले जावे, आदी महत्त्वाच्या मुद्यावर कोहचाडे याने लोखंडे यांच्याशी बोलणी करून सात लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. १९ जून १९९९ रोजी सीताबर्डी अभ्यंकर रोडवरील गणगौर रेस्टॉरंटमध्ये पैसे घेण्याचे ठरले होते. तत्पूर्वी, अनिल लोखंडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. ठरल्याप्रमाणे दुपारी २.२० वाजताच्या सुमारास यादव कोहचाडे हा सात लाखांची रक्कम घेऊन गणगौरमध्ये दाखल झाला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) पथकाने आधीच सापळा रचला होता. कोहचाडे हा ही रक्कम लोखंडे यांना देताच एसीबीच्या पथकाने कोहचाडे याला रंगेहात अटक केली होती. त्याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक पी.डी. गवई यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात सरकारच्या वतीने पाच आणि बचाव पक्षाच्या वतीने तीन साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील वर्षा आगलावे यांनी काम पाहिले. २००० पासून हे प्रकरण न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी होते. प्रारंभी तत्कालीन जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे आणि त्यानंतर तत्कालीन सहायक सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी हा खटला चालविला होता. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. नायडू यांनी काम पाहिले. कोहचाडेची कारागृहात रवानगी एवढ्या मोठ्या रकमेची लाच देण्याचे आणि एसीबीकडून कारवाई होण्याचे हे नागपूरच्या इतिहासातील हे पहिलेच प्रकरण होते. कोहचाडे हा या प्रकरणात काही काळ कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी खटल्याचा निकाल सुनावला जाणार असल्याने कोहचाडे हा न्यायालयात उपस्थित होता. न्यायालयाने यादव कोहचाडे याला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावताच पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कारागृहाकडे रवानगी करण्यात आली. न्यायालयाने कोहचाडेला तीन वर्षांची शिक्षा सुनावली असती तर तो कदाचित जामिनावर सुटला असता.