शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांच्या शोषणावर लिहिणे दुर्मिळच

By admin | Updated: April 9, 2016 03:16 IST

साधारणत: लेखिका स्त्रीवादी झाल्या आहेत आणि स्त्रीवादाच्या एका विशिष्ट प्रवाहातच त्या सापडत आहेत की काय,...

रवींद्र शोभणे : मनिषा साधू यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशननागपूर : साधारणत: लेखिका स्त्रीवादी झाल्या आहेत आणि स्त्रीवादाच्या एका विशिष्ट प्रवाहातच त्या सापडत आहेत की काय,असा प्रश्न निर्माण होत असताना आखाती देशात पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आणि शोषणाबाबत लिहिण्याचे धाडस एखाद्या लेखिकेने दाखवावे, ही साहित्य क्षेत्रातील अतिशय महत्त्वाची घटना आहे. भारतातून कामाच्या निमित्ताने अनेक पुरुष बायका-पोर व देश सोडून आखाती देशात जातात. पण तेथे या पुरुषांसोबत कसे वर्तन केले जाते, त्यांना कुठल्या शोषणाला सामोरे जावे लागते आणि यातून त्यांची स्थिती आणि मानसिकता कशी होते, याचे विवेचन करणारी कादंबरीच मनिषा साधू यांनी लिहिली असून यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही कादंबरी झाली असल्याचे मत कादंबरीकार रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केले.मनिषा साधू यांच्या पुरुषांच्या देशात ही कादंबरी, सटवाई आणि मुक्त मी हे मराठी कवितासंग्रह आणि ‘सांवला चांद’ हा हिंदी कवितासंग्रह शुक्रवारी डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रवींद्र शोभणे बोलत होते. याप्रसंगी बाळासाहेब उपाध्ये प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या राष्ट्रभाषा संकुलातील संवाद कक्षात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शोभणे म्हणाले, लेखनावर कुणाचाही आणि स्वत:चाही निर्बंध नसावा. अनुभवांना लेखनातून अभिव्यक्त होणे गरजेचे आहे, तेच खरे अस्सल लेखन असते. ज्याचे अनुभव समृद्ध असतात तो लेखनातून ते मांडतो. साहित्य क्षेत्रात कोण कुणाच्या पाठीत सुरा खुपसेल ते सांगता येत नाही. स्वत:चेच लेखन सरस आणि इतरांचे दुय्यम मानणाराही एक वर्ग आहे. पण अशा लोकांना न घाबरता आपली अभिव्यक्ती लेखनातून करीत राहणे, हेच लेखकाचे कर्तव्य आहे. सध्या महिला पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने लिहित असल्या तरी स्त्रीवादाच्या चक्रात साचल्यागत होत आहेत. आपला आवाका वाढवून नवनव्या विषयांना भिडण्याचे सामर्थ्य लेखिकांनी आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. साहित्यात सभ्य-असभ्य, श्लील-अश्लील असे काहीच नसते. ती त्या कथावस्तूची मागणी असते. पण आपल्याकडे मात्र अशा लेखनाला हिणवले जाते आणि केस पांढरे झाल्यावरच त्याचा उदोउदोही केला जातो, असे ते म्हणाले. गिरीश गांधी म्हणाले, काही चर्चासत्रातून कुणी बुद्धिवंत ठरत नाही. लेखक हा वाचक आणि समीक्षक रसिकांच्या भट्टीतून तावून सुलाखून निघतो त्यानंतरच त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते. यासंदर्भात वैदर्भीय उदारमतवादी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.(प्रतिनिधी)