शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

विश्व रिसायकल डे; १८०० टन ई-वेस्टचे नागपूरच्या पर्यावरणावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:16 IST

Nagpur News नागपूर शहरातून दरवर्षी १८०० ते २००० टन ई-कचरा बाहेर पडताे. विदर्भात हा आकडा २५ हजार टनांच्यावर जाण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

ठळक मुद्देहा अधिकृत आकडा केवळ ५ टक्के पुनर्प्रक्रियेची नितांत गरज

निशांत वानखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशाेधनाने मानवी जीवन अधिक सुकर केले असले तरी त्यातून हाेणाऱ्या कितीतरी पटींच्या प्रदूषणाने समस्याही निर्माण केली आहे. आधी प्लॅस्टिकचा कचरा पर्यावरणासाठी डाेकेदुखी ठरली असताना ‘ई-वेस्ट’ म्हणजेच इलेक्ट्राॅनिक्स कचऱ्याने प्रदूषणाच्या समस्येचे विक्राळ रूप धारण केले आहे. माेबाईल व कॉम्प्युटरच्या अविष्काराने माेठी क्रांती केली पण त्यातून निघणारा ई-कचरा अत्याधिक घातक ठरत आहे. भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा ई-वेस्ट जनरेटर देश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणानुसार, नागपूर शहरातून दरवर्षी १८०० ते २००० टन ई-कचरा बाहेर पडताे. विदर्भात हा आकडा २५ हजार टनांच्यावर जाण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

उल्लेखनीय म्हणजे हा डेटा केवळ अधिकृतरीत्या गाेळा हाेणाऱ्या कचऱ्याचा आहे आणि ताे केवळ ५ टक्केच आहे. जाणकारांच्या मते, ९५ टक्के ई-वेस्ट एकतर नियमित कचऱ्यासाेबत फेकले जाते किंवा भंगार विक्रेत्यांना विकले जाते. निरुपयाेगी माेबाईल, सिमकार्ड, लॅपटाॅप, डेस्कटाॅप पीसीज, वेगवेगळे गेम्स डिव्हाईस, फॅक्स मशीन्स, अल्ट्रासाऊंड स्पीकर्स, संगणकाशी संबंधित सर्व साहित्य, व्हिडिओ कॅमेरा, टीव्ही, आयपाॅड, एमपी-३ प्लेयर्स, एलसीडी, एलईडी बल्ब, बॅटरी, चार्जर्स, वायर, सर्किट बाेर्ड, केबल बाॅक्सेस, माेटर जनरेटर, माेठ्या प्रमाणात निकामी झालेले लॅन्डलाईन फाेन्स, सिक्युरिटी इक्वीपमेंट्स, वाॅशिंग मशीन्स, रेफ्रीजरेटर्स, एअर कंडिशनर्स असा २०० च्यावर प्रकारचा ई-कचरा दरराेज लाेकांच्या घरातून बाहेर पडताे. गेल्या १० वर्षांत या कचऱ्याचे प्रमाण भरमसाठ वाढले असून त्यावर नियंत्रण मिळविणे अत्यंत कठीण झाले आहे. हा कचरा केवळ नागपूर शहर किंवा भारतासाठी नव्हे तर जगभरासाठी आव्हान ठरला आहे.

रिसायकल हाेते पण अत्यल्प

नागपूर शहरात सुरीटेक्स्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे स्वच्छ नागपूरसारख्या एनजीओच्या सहकार्याने ई-वेस्टचे कलेक्शन केले जाते. सुरीटेक्स्टच्या व्यवसाय विभागप्रमुख महिमा सुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ३६० टन ई-वेस्ट गाेळा करण्याची परवानगी आहे, जी आता वाढून २००० टन करण्यात येईल. मात्र हा केवळ ५ टक्केच आहे. माेठ्या प्रमाणात हा कचरा भंगारात गाेळा केला जाताे व त्यातून मूल्यवान धातू काढून पुढे ताे जाळला किंवा फेकला जाताे. तर काही सामान्य कचऱ्यात फेकला जाताे. जनजागृतीचा अभाव असल्याने हा प्रकार हाेत आहे. हे धाेकादायक असून प्रदूषणाचे घातक परिणाम हाेत आहेत. संस्थेकडे गाेळा हाेणाऱ्या कचऱ्याचे रिसायकलिंग करून इलेक्ट्राॅनिक्स डिव्हाईस म्हणूनच पुनर्निर्मिती केली जात असल्याचे सुरी यांनी स्पष्ट केले.

ई-वेस्ट १० पट घातक

- इलेक्ट्राॅनिक्स कचऱ्यातून शिसे, कॅडमियम, मर्क्युरी, क्राेमियम, बेरियम, बेरिलियम व इतर धाेकादायक कंपाेनंट बाहेर पडतात.

- हा कचरा तसाच जाळल्यास अत्यंत धाेकादायक वायू प्रदूषणास कारणीभूत ठरताे.

- ई-कचऱ्याच्या प्रदूषणामुळे नर्व्हस सिस्टििम, रक्तसंस्था, किडनीचे न बरे हाेणारे आजार हाेतात.

- बालकांची ब्रेन डेव्हलपमेंट थांबते.

- श्वसनाचे व त्वचेचे धाेकादायक आजार हाेतात.

- डीएनए डॅमेज हाेण्याचा अत्याधिक धाेका. हृदय, यकृतावर घातक परिणाम.

- पर्यावरणावर गंभीर परिणाम.

टॅग्स :environmentपर्यावरण