शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

काम कवडीचे नाही, दमडीही खर्च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निवडणुका आल्या की विकासाच्या घोषणा होतात. निवडणूक संपली की, पदाधिकाऱ्यांना आश्वासनाचा विसर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : निवडणुका आल्या की विकासाच्या घोषणा होतात. निवडणूक संपली की, पदाधिकाऱ्यांना आश्वासनाचा विसर पडतो. मनपातील सत्ताधारी असाच चौफेर शहर विकासाचा दावा करीत आहेत. प्रत्यक्षात काही मोजके प्रकल्प वगळता या घोषणाच ठरल्या आहेत. उपराजधानीचे कधीकाळी वैभव असलेल्या नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाची मागील दशकापासून घोषणा सुरू आहेत. ११८ कोटींचा प्रकल्प आज २११७.७१ कोटींवर पोहचला. मात्र अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे काम कवडीचे नाही अन् दमडीही खर्च नाही, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

सर्वप्रथम २५ नोव्हेंबर २००८ मध्ये, त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१० मध्ये नागनदी पुनजीर्वित व प्रदूषणमुक्त करण्याचा प्रस्ताव आला. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांनी २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात नाग नदी प्रकल्पासाठी ११८ कोटींचा निधी खर्च करण्याची घोषणा केली होती. परंतु आजवर हा निधी खर्चच झाला नाही. त्यानंतर तीन वर्षांनी १८ मार्च २०१६ रोजी केंद्र सरकारकडून १ हजार २५२.३३ कोटींच्या निधीस तत्त्वत: मंजुरी मिळाली. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन कंपनी (जिका) कंपनीने सर्वेक्षणाला सुरुवातही केली होती. परंतु कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. परिणामी प्रकल्पाचा खर्च वाढून २११७.७१ कोटींवर गेला आहे. म्हणजेच २०१६ च्या तुलनेत प्रकल्पाचा खर्च ८६५.३८ कोटींनी वाढला आहे. या प्रकल्पात शहरातील तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेसोबतच स्टॉर्म ड्रेनलाइन व मलजलवाहिन्यांच्या कामांचा समावेश आहे. यात केंद्र सरकार, राज्य सरकार व नागपूर महापालिका यांचा ६०:२५:१५ या प्रमाणात आर्थिक वाटा राहणार आहे. त्यानुसार मनपाला आठ वर्षांत २९६.८२ कोटींचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे. केंद्र सरकारला जायकाकडून ०.९५ टक्के व्याजदराने ३० वर्षांसाठी १ हजार ८२० कोटी रुपये कर्ज मिळणार आहे.

नदीत सिवरेज सोडणे कधी थांबणार?

२०११ मध्ये शहराला ५२० एमएलडी पाणीपुरवठा होत होता. यातून निर्माण होणाऱ्या ३४५ एमएलडी सांडपाण्यापैकी ८० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात होती. उर्वरित २६५ एमएलडी सांडपाणी नदीत सोडले जात होते. आज शहराला जवळपास ७०० एमएलडी पाणीपुरवठा होतो. यातून ५५० एलएलडी सिवरेज निर्माण होते. पैकी ३०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होते. उर्वरित २५० सिवरेज नदीत सोडले जाते. म्हणजेच दहा वर्षांपूर्वी व आज नदीत सोडण्यात येणाऱ्या सिवरेजमध्ये फारसा फरक पडलेला नाही.

....

असे आहे निधी नियोजन

- केंद्र सरकार : १,३२३ कोटी (६० टक्के)

- राज्य सरकार : ४९७ कोटी (२५ टक्के)

- महापालिका : २९६ कोटी (१५ टक्के)

....

भाग- १