शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

सोमवारपासून सुरू होणारे नागपूरचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार

By यदू जोशी | Published: December 09, 2017 5:27 AM

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे. शेतकºयांची कर्जमाफी, बोंडअळीने झालेले पिकांचे नुकसान, कायदा व सुव्यवस्था, खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे. शेतकºयांची कर्जमाफी, बोंडअळीने झालेले पिकांचे नुकसान, कायदा व सुव्यवस्था, खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा, समृद्धी महामार्ग, आयटी विभागाचा घोळ, शिक्षण खात्याचे काही निर्णय आदी मुद्यांवर विरोधक हल्लाबोल करतील,असे चित्र आहे. तर विरोधकांचे हल्ले अत्यंत आक्रमकपणे परतवून लावण्याची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखली आहे.कर्जमाफीपासून विविध मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार गृहपाठ केला असून विरोधकांच्या संभाव्य आरोपांना परतवून लावण्यासाठी आकडेवारीसह सर्व दारूगोळा तयार ठेवला आहे. दुसरीकडे रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित चहापानावर विरोधक नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.१२ डिसेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे विधिमंडळावर शेतकºयांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद या मोर्चाचे नेतृत्व करतील. या मोर्चाने विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला तर त्याचे पडसाद अधिवेशनातही उमटतील. राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोल मार्चे काढून आधीच सरकारविरोधी वातावरण पेटविले आहे.या अधिवेशनादरम्यान गुजरात निवडणुकीचा निकाल १८ डिसेंबरला लागणार असून त्या निकालाचे पडसादही अधिवेशनात उमटतील. भाजपाला विजय मिळाल्यास सरकार आत्मविश्वासाने कामकाज चालवेल, आणि फटका बसला तर विरोधक अधिक आक्रमक होतील.विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे प्रसाद लाड विजयी होताना काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटल्याचे उघड झाल्याने विरोधकांवर नामुष्की ओढावली आहे. १२ तारखेच्या निमित्ताने एकत्र येत असलेले विरोधी पक्ष त्याच एकीने विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात आक्रमक होतील का यावर बरेच काही अवलंबून असेल. लाड यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-शिवसेना यांच्यात दिसलेली एकी अधिवेशनात दिसते का हाही औत्सुक्याचा विषय असेल.गोंधळापेक्षा चर्चा करा, प्रत्येकआरोपाचे उत्तर देतो : मुख्यमंत्रीविधिमंडळाच्या अधिवेशनात गोंधळ घालण्याकडेच विरोधकांचा कल दिसून आला आहे. यावेळी तरी त्यांनी चर्चा करावी म्हणजे त्यांच्या एकेक प्रश्नाचे सडेतोड उत्तर मी देईन, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आव्हान दिले. लोकमतशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकºयांची आजची अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच झाली अन् आज ते हल्लाबोल करायला निघाले आहेत. आम्ही राज्याच्या हितासाठी काय केले याची यादी तर आमच्याकडे आहेच पण त्यांच्या पापांचा हिशेबही आहे. तो आता सांगावाच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.अपयशी सरकारला जाबविचारणारच : राधाकृष्ण विखे पाटीलकर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकºयांचीचेष्टा चालविली आहे. कायदा व सुव्यवस्था राज्यात राहिलेली नाही. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत असलेल्या फडणवीस सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, आमची कामगिरी दमदार असे सांगणाºया सरकारने राज्याच्या हितासाठी काय केले? या सरकारचा मी लाभार्थीम्हणून जाहिरातबाजी केली पण सरकारी योजनांच्या अपयशाची पोलखोल आम्ही अधिवेशनात करू. १२ तारखेच्या मोर्चानंतर आम्ही सभागृहात सरकारविरुद्धमोर्चा उघडू.

टॅग्स :BJPभाजपाChipi airportचिपी विमानतळcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस