शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

खिंडसी पूरक कालवा पूर्णत्वास जाणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:08 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : महादुला (ता. रामटेक) व परिसरातील शेकडाे शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या खिंडसी पूरक कालव्याचे ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : महादुला (ता. रामटेक) व परिसरातील शेकडाे शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या खिंडसी पूरक कालव्याचे काम मध्ये बंद करण्यात आले. ते पुन्हा सुरू करण्यासाठी नेते व अधिकाऱ्यांच्या मध्यंतरी झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्यातच या कालव्याचे काम सुरू करण्याची मागणी करीत महादुला येथील शेतकऱ्यांनी आंदाेलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी आ. आशिष जयस्वाल यांच्याशी चर्च केली असता, त्यांनी काम सुरू हाेण्याचे संकेत दिले. ते कधी सुरू हाेणार व पूर्णत्वास जाणार हे मात्र स्पष्ट केले नाही.

तालुक्यातील २७ गावांमध्ये सिंचनाची काेणतीही साेय नसल्याने येथील शेतकऱ्यांना केवळ काेरडवाहू शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून राहावे लागते. या भागात धानाची शेती केली जात असल्याने तसेच धानाला माेठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने खिंडसी पूरक कालवा निर्मिती राज्य शासनाने मंजुरी दिली. पेंच प्रकल्पातील पाणी खुला व भूमिगत कालव्याद्वारे खिंडसी जलाशयात आणायचे. त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करायचा अशी ही याेजना आहे. या जलाशयाची पाणी साठवण क्षमता १०४ दलघमी आहे. यात ६७ दलघमीपेक्षा अधिक पाणी राहिल्यास ते कालव्याद्वारे सिंचनाला पाणी देण्याचे या प्रकल्पाद्वारे नियोजन केले हाेते.

या प्रकल्पावर २०० काेटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, उर्वरित कामासाठी १०० काेटी रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रकल्प मध्येच गुंडाळणे आत्मघातकी ठरू शकते, अशी प्रतिक्रिया जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे. कारण, पेंच जलाशय ताेतलाडाेहमुळे लवकर भरत असल्याने त्यातील पाणी खिंडसीत आणणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी भंडारबाेडी, महादुला, पंचाळा व हसापूर येथील ११३ शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी देण्याची तयारी दर्शविली असताना प्रशासन काहीही हालचाली करायला तयार नाही. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी धनराज झाडे, मनाेहर दियेवार, हेमराज बडवाईक, राजेश चाैरे, हिंमत घाेडागाडे, धनराज बडवाईक, रामलाल वैद्य, अंकुश वैद्य, चंद्रभान मेहर या शेतकऱ्यांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

...

२०१७ मध्ये पूर्ण हाेणे अपेक्षित

या प्रकल्पाला राज्य सरकारने सन २०१० मध्ये मंजुरी दिली हाेती. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत २०७.९ काेटी रुपये असल्याचे सांगण्यात आले हाेते. हा प्रकल्प सन २०१७ मध्ये पूर्ण हाेणे अपेक्षित हाेते. वास्तवात, पूर्णत्वाची मुदत संपून साडेतीन वर्षे झाले आहेत. या प्रकल्पात रामटेक तालुक्यातील १४ व भंडारा जिल्ह्यातील चार गावांचा समावेश केला आहे. याची सिंचन क्षमता २,४९३ हेक्टरची आहे.

...

२० टक्के कामासाठी १०० काेटींची गरज

आजवर या याेजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, त्यावर २०० काेटी रुपयांचा खर्च झाल्याचे तसेच उर्वरित २० टक्के कामासाठी १०० काेटी रुपयांची आवश्यकता असल्याचे अधिकारी व नेते सांगतात. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह व पेंच या दाेन प्रकल्पातील पाण्याची आवक कमी झाली आहे. कारण, तिन्ही प्रकल्प पेंच नदीवर आहेत. पेंच प्रकल्पात पाणीसाठा नसल्यास खिंडसी पूरक कालवा कुचकामी ठरताे.