शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

विशेष परीक्षेचा भुर्दंड कोण भरणार?

By admin | Updated: August 14, 2014 01:21 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेली असतानादेखील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. संबंधित विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता विशेष परीक्षेला

नागपूर विद्यापीठ : दोषी महाविद्यालयांबाबत प्रशासनाचे मौननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेली असतानादेखील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. संबंधित विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता विशेष परीक्षेला मान्यता देण्यात आली अन् त्याची तयारी सुरू झाली. परंतु संबंधित परीक्षेसाठी होणारा खर्च हा विद्यापीठाच्या तिजोरीतून होणार आहे. महाविद्यालयांच्या चुकीमुळे संबंधित परीक्षा घेण्याची वेळ आली असताना त्यांच्याकडूनच याचा खर्च वसूल करण्यात यावा, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू झाली आहे. संबंधित मुद्यावर विद्यापीठाने मौन साधले आहे.राज्यपाल कार्यालयाने मंजुरी दिल्यामुळे २८ आॅगस्टपासून विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. यासंबंधीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु विद्यापीठाला सर्व जिल्ह्यांत ही परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांचा खर्च, वाहतूक खर्च, मनुष्यबळ याचे नियोजन करावे लागणार आहे. याशिवाय कला, विज्ञान व वाणिज्य शाखा मिळून निरनिराळ्या अभ्यासक्रमांच्या यात परीक्षा घेतल्या जाणार आहे. त्यांच्यासाठी परीक्षा ‘मॉडरेशन’ पासून ते उत्तरपत्रिका, मूल्यांकन, निकाल जाहीर करणे इत्यादी प्रकारची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. याशिवाय, परीक्षा विभागावर अगोदरच उन्हाळी परीक्षांच्या निकालाचे ओझे आहे. अनेक कर्मचाऱ्यांना जास्त वेळ थांबून काम करावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांचा मोबदला इत्यादींसाठी विद्यापीठाच्याच तिजोरीतून पैसे खर्च होणार आहेत. संबंधित परीक्षा ही प्रवेशबंदी घातलेल्या महाविद्यालयांनी नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे उद्भवली आहे. अशा स्थितीत या महाविद्यालयांकडूनच विद्यापीठाने परीक्षेचा खर्च का वसूल करू नये, असा प्रश्न नाव न घेण्याच्या अटीवर काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांचा नामांकन नोंदणी क्रमांक नसतानादेखील त्यांच्या नावावर समाजकल्याण व आदिवासी विभागाकडून शिष्यवृत्ती उचलली असल्याची तक्रार समाजकल्याण विभागाला प्राप्त झाली आहे.(प्रतिनिधी)