शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अपंग, मतिमंदांचा वाली कोण?

By admin | Updated: July 16, 2014 01:13 IST

देशातील सुमारे पाच कोटी विकलांगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘अच्छे दिन’अजून कोसो दूर आहेत. यावेळच्या मोदी सरकारच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात या घटकासाठी काहीही तरतूद करण्यात आली नाही,

शंकरबाबा पापळकर यांचा संतप्त सवालनागपूर : देशातील सुमारे पाच कोटी विकलांगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘अच्छे दिन’अजून कोसो दूर आहेत. यावेळच्या मोदी सरकारच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात या घटकासाठी काहीही तरतूद करण्यात आली नाही, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली आहे. पापळकर यांनी आजवर अनेक अपंग व मतिमंदांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा न्यायालयीन लढासुद्धा दिला आहे.‘लोकमत’शी बोलताना शंकरबाबा म्हणाले, देशात दरवर्षी एक लाख विकलांग बेवारस दिसतात. त्यांचा ठावठिकाणा नाही. एकट्या महाराष्ट्रात पाच लाख मतिमंद असून १० हजारावर बेवारस आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. देशातील या दुर्लक्षित घटकासाठी दरवर्षी अर्थसंकल्पीय तरतूद झाली पाहिजे. किमान १० हजार कोटी रु. त्यांच्यासाठी राखून ठेवले पाहिजे. मानसिक विकलांगांसाठी सिकंदराबाद येथे एक मोठे केंद्र आहे; त्या धर्तीवरच बेवारस मतिमंदांचेही पुनर्वसन झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.देशात व राज्यात मोठमोठ्या स्वयंसेवी सामाजिक संस्था आहेत, पण त्यांना या दुर्लक्षित घटकाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा शब्दात संताप व्यक्त करून शंकरबाबा म्हणाले, सरकारकडून अनुदान लाटणाऱ्या या संस्थांची सरकारविरुध्द आवाज उठविण्याची मानसिकता नाही.बेवारस अपंग व मतिमंदांसाठी योजना आखण्यात सरकार खरेच प्रामाणिक असेल तर या कामी सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. (प्रतिनिधी)