शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
6
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
7
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
8
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
9
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
10
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
11
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
12
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
13
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
14
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

शिक्षकांची ओळखपत्रे गेली कुठे? पोलिसांच्या दंडुक्याचा धाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 11:04 AM

लॉकडाऊनमध्ये शिक्षण विभागाच्या कामासाठी शिक्षकांना आता ओळखपत्राची गरज भासते आहे. शासनाने शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे धान्य वाटप करावे, असे निर्देश दिले आहेत. पण देशभरात लागलेल्या संचारबंदीमुळे विना ओळखपत्र बाहेर कसे पडावे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

ठळक मुद्देपोषण आहार वाटपाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईतर्फे जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील वर्ग १ ते ८ च्या प्राथमिक शिक्षकांना ओळखपत्र देण्यासाठी प्रती शिक्षक पन्नास रुपये अनुदान जिल्हा परिषदेकडे उपलब्ध करून दिले होते. परंतु गेल्या चार महिन्यांपासून शिक्षकांना ओळखपत्र देण्यात आले नाही. लॉकडाऊनमध्ये शिक्षण विभागाच्या कामासाठी शिक्षकांना आता ओळखपत्राची गरज भासते आहे. शासनाने शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे धान्य वाटप करावे, असे निर्देश दिले आहेत. पण देशभरात लागलेल्या संचारबंदीमुळे विना ओळखपत्र बाहेर कसे पडावे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी व जमावबंदी लागू असताना ओळ्खपत्राची गरज भासत आहे. शाळेच्या प्रशासकीय कामासाठी व शालेय पोषण आहार योजनेच्या धान्य वाटपासाठी शाळा मुख्याध्यापकांना राज्याचे शिक्षण संचालक, शिक्षण सचिवापासून तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी व शापोआ अधीक्षक फक्त आदेश जारी करीत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा, अनुदानित शाळांमधील बहुतांश शिक्षक हे शहरात वास्तव्यास आहेत. विद्यार्थ्यांना दोन दिवसांत पोषण आहाराचे धान्य वाटप करायचे आहे. त्यातही सोशल डिस्टन्सिंग ठेवायचे आहे. शक्य नसेल तर विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोषण आहार पोहचवून द्यायचा आहे. परंतु प्रत्यक्षात शाळेपासून दूरवर राहणाऱ्या शिक्षकांजवळ सरकारी ओळखपत्र नसल्याने पोलीस त्यांना माघारी घरी पाठवतात. संचारबंदीमुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांचे दंडुके बसत आहेत. त्यामुळे शिक्षकसुद्धा घाबरले आहेत. अशात पोषण आहाराचे काम कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनाने सर्व शिक्षकांना सरकारी ओळखपत्राची पूर्तता करण्याचे निर्देश जि.प. प्रशासनास द्यावेत, अशी मागणी मनसे शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर, महेश जोशी आदींनी केली आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षक