शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जे उद्धव ठाकरेंच्या मालकीचेच नाही ते आंबेडकरांना कसे देणार ?

By कमलेश वानखेडे | Updated: May 28, 2023 08:00 IST

Nagpur News अकोला लोकसभेत गेल्या चार टर्मपासून भाजपचे खासदार संजय धोत्रे हे विजयी झेंडा रोवत आहेत. आघाडीत ही जागा काँग्रेस लढत आली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती जाहीर केली.

 

 

नागपूर : अकोला लोकसभेत गेल्या चार टर्मपासून भाजपचे खासदार संजय धोत्रे हे विजयी झेंडा रोवत आहेत. आघाडीत ही जागा काँग्रेस लढत आली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती जाहीर केली. पण ॲड. आंबेडकर अद्याप महाविकास आघाडीत दाखल झालेले नाहीत. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादी ही जागा आंबेडकरांसाठी सोडण्यास इच्छुक नाही. एकूणच परिस्थिती पाहता जे उद्धव ठाकरेंच्या मालकीचेच नाही ते आंबेडकरांना कसे देणार, असा पेच निर्माण झाला आहे.

अकोला मतदारसंघात नेहमी भाजप, काँग्रेस व भारिप बमसं (सध्याची वंचित बहुजन आघाडी) अशीच तिहेरी लढत होते. कधी काँग्रेस तर कधी वंचित बहुजन आघाडी आलटून पालटून दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस लढत आली. गेल्या चार दशकांपासून येथे काँग्रेसचा होत असलेला पराभव याचे भांडवल करीत शिवसेना या जागेवर दावा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ॲड. आंबेडकर यांच्याशी मैत्रीचा हात मिळविला आहे. पण सत्तासंघर्षातील निकालानंतर अकोल्यातील पत्रकार परिषदेत त्यांना आघाडीतील प्रवेशासंदर्भात छेडले असता, मी शिवसेना ठाकरे गटाचा मित्र आहे, महाविकास आघाडीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आंबेडकर हे महाविकास आघाडीकडे स्वत: अकोल्याची जागा मागणे टाळत आहेत. पण त्यांच्यावतीने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांत प्राथमिक चर्चाही आटोपली आहे. ॲड. आंबेडकरांना महाविकास आघाडीत थेट जागा मिळाली नाही तर ती आपल्या कोट्यात घेऊन आंबेडकरांना लढविण्याची शिवसेनेची तयारी आहे. हा पेच सोडविण्यात यश आले व काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची व्होट बँक एकत्र आली तर भाजपला तगडी फाइट दिली जाऊ शकते.

सुरुवातीची दहा टर्म काँग्रेसकडे असलेली अकोल्याची जागा १९८९ मध्ये हिसकावण्यात भाजपचे पांडुरंग फुंडकर यांना यश आले होते. फुंडकर तीन टर्म विजयी झाल्यानंतर १९९८ व १९९९ या दोन्ही निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून ही जागा खेचली होती. यापैकी ९८ च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार यांच्या पुढाकाराने धर्मनिरपेक्ष मतांची मोट बांधली गेली होती. ॲड. आंबेडकर (रा. गवई, अमरावती), प्रा. जोगेंद्र कवाडे (चिमूर) व रामदास आठवले (मुंबई उत्तर मध्य) हे आंबेडकरी नेते खुल्या मतदारसंघातून विजयी झाले होते. आता भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचे तसेच प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्राच्या नजरा अकोल्याकडे असतील.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Dhotreसंजय धोत्रे