शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात रस्त्यांसह मिळू लागले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:24 PM

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसह पाणीही उपलब्ध होऊ लागले आहे.

ठळक मुद्देराज्य महामार्गासह जलसंधारणाची कामे : गडकरींच्या निर्णयाचे फलित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसहपाणीही उपलब्ध होऊ लागले आहे.महाराष्ट्रातील अनेक भाग आजही दुष्काळग्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्या होताहेत. या गंभीर समस्येची जाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ‘महामार्गाचे रुंदीकरण करतांना परिसरातील नदी-तलावांचे खोलीकरण करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्य महामार्ग बांधत असताना मोठ्या प्रमाणावर मातीची गरज असते. ही माती बाहेरून बोलावली जाते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च येतो. अशा परिस्थितीत रस्ता रुंदीकरण करताना जवळपासच्या नदी-तलावांमधील गाळाचा वापर करण्यास गडकरी यांनी मंजुरी दिली. यातून दोन फायदे होत आहेत. एक तर नदी-तलावातील गाळ काढून या मातीची गरज भागवल्यास रस्ता बांधकामास मदत होते. यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होईल आणि नदी तलावांचे खोलीकरण होऊन ते पुनर्जीवित होत आहेत. यातून जलसंधारणाचे कामही होत आहे.महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हा परिसरही शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. गडकरींच्या निर्णयानंतर या परिसरातील नदी, नाले आणि तलावांना पुनर्जीवित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येथील राज्य महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे खामगावमध्ये अनेक सकारात्मक बदलांनी गती पकडली आहे. यापूर्वी या भागात पाणी साठवण्याची क्षमता खूप कमी होती. त्यामुळे भरपूर पाऊस होऊनही नदी, नाले, तलाव आणि बांधांमधील पाणी पुन्हा वाहून जात होते. परंतु यावेळी जलस्रोतांवर बांध बांधल्यामुळे आणि नदी-नाले व तलावातील गाळ काढल्यामुळे वाहून जाणारे पाणी नदी-नाले व तलावांमध्ये थांबले आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की, गेल्या ३० वर्षानंतर येथील नदी-नाले व तलावांमध्ये इतके पाणी असल्याचे पाहायला मिळाले आहे.असे बदलले चित्रबुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग सुधाराचे चार प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या मातीसाठी २७ तलाव आणि १२ नदींमधील गाळ काढण्यात आला आहे. एकूण ३०,७५,००० घनमीटर माती काढण्यात आली. यामुळे या नदी-तलवातील पाणी साठवण्याची क्षमता वाढून ती ३०७५ टीसीएम पर्यंत पोहोचली आहे. यामुळे परिसरातील ५२ गावे आणि ३८ पाणीपुरवठा योजनेलाही याचा लाभ झाला आहे. तसेच आतापर्यंत १५,००० विहिरीसुद्धा पुन्हा पाण्याने भरल्या आहेत. 

टॅग्स :highwayमहामार्गWaterपाणी