शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

प्रभाग रचनेने वॉर्डात बिघाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST

कळमेश्वर : नगर परिषदेच्या राजकीय सारिपाटावर आता पुन्हा नव्याने खेळी मांडावी लागत आहे. शासनाने ‘एक वाॅर्ड, एक नगरसेवक’ हा ...

कळमेश्वर : नगर परिषदेच्या राजकीय सारिपाटावर आता पुन्हा नव्याने खेळी मांडावी लागत आहे. शासनाने ‘एक वाॅर्ड, एक नगरसेवक’ हा निर्णय बदलून आता जुन्या पद्धतीनेच एका प्रभागात दोन सदस्य असा निर्णय घेतला आहे. यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी करणाऱ्या इच्छुकांना आता राजकीय पक्षाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. यामुळे इच्छुकांनी आतापर्यंतच्या केलेल्या तयारीवर पाणी फिरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिकेत सध्या ८ प्रभाग आहेत. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते, तर एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडण्यात आले होते. नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून झाली होती. तीत भाजपच्या स्मृती इखार विजयी झाल्या होत्या. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता पालिकेत आता भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी ८, तर शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत.

नवीन प्रभाग पद्धतीमुळे आगामी निवडणुकीत शहरातील प्रभाग रचना पूर्णतः बदलणार आहे. प्रभागासोबतच नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज आहे. प्रभागनिहाय आरक्षण, मतदार संख्या या बाबींची रचना निवडणुकीच्या चार महिने आधी होणार आहे. कळमेश्वर शहराच्या हद्दवाढीत ब्राह्मणीचा समावेश झाला. यानंतर येथे एक नगरसेवक निवडून आला होता. आता नव्याने प्रभागरचना होऊन कळमेश्वर-ब्राह्मणी अशी प्रभाग रचना होणार असल्याने यावेळी किती प्रभाग पडतात व किती नगरसेवक होतात याबाबत शहरात चर्चा सुरू आहे.

शहर विकासाचे काय?

थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची बांधिलकी संपूर्ण शहरासोबत असते. त्यामुळे सर्वच भागात त्याला विकासकामे करावी लागतात. आता नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून होणार नसल्याने प्रभागातून निवडून आलेला नगरसेवक नगराध्यक्ष होईल. त्यामुळे विरोधकांच्या प्रभागात काम करण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. हा प्रकार यापुढेही झाल्यास शहर विकासाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.