शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

रस्त्यांवर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांचा बंदोबस्त हवाच : पोलिसांनी कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:46 AM

देशभरात ‘लॉकडाऊन’ असतानादेखील नागपुरात काही रिकामटेकडे काहीही आपात्कालीन कार्य नसताना रस्त्यांवर फिरताना तसेच घोळका करून गप्पा हाकताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देअतिशहाण्यांना धडा शिकविलाच पाहिजे, कसा होणार ‘कोरोना’चा बंदोबस्त

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांमध्ये वाढ होणे ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखणे अनिवार्य झाले आहे; परंतु देशभरात ‘लॉकडाऊन’ असतानादेखील नागपुरात काही रिकामटेकडे काहीही आपात्कालीन कार्य नसताना रस्त्यांवर फिरताना तसेच घोळका करून गप्पा हाकताना दिसून येत आहेत. अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई करून पोलिसांनी त्यांच्यातील ‘अतिहुशारी’ बाहेर काढण्याची वेळ आली आहे. असे केले तरच ‘कोरोना’चा खऱ्याअर्थाने संसर्ग टाळल्या जाऊ शकतो.

‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी दिवसभर शहरातील विविध भागांची पाहणी केली. यादरम्यान अतिशय धक्कादायक बाबी दिसून आल्या. कडेकोट बंदोबस्त असलेले चौक वगळता बऱ्याच ठिकाणी रिकामटेकडे बिनधास्तपणे गाड्यांवर फिरताना दिसून आले. काही जणांना विचारणा केली असता अगदी थातूरमातूर कारणे दिली. प्रत्यक्षात आपात्कालीन सेवेत असणाऱ्यांनीच घराबाहेर निघावे, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. किराणा, भाजी आणण्यासाठी निघाले तर तेदेखील समजू शकतो. परंतु काहीच काम नसताना एखाद्या मित्राकडे किंवा नातेवाईकाकडे जाण्याचे प्रकार सुरू आहेत.याशिवाय काही चौकांत तर स्थानिक रहिवासी एकत्रित येऊन गप्पा मारतानादेखील दिसून आले. अशा सर्व लोकांवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. अशा लोकांना ‘कोरोना’ची लागण होण्याचा सर्वात जास्त धोका असून ते त्याचे वाहक बनू शकतात. त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.अंतर्गत भागातदेखील ‘पॅट्रोलिंग’ हवेसाधारणत: शहरातील चौक, मुख्य रस्ते येथे पोलीस कर्मचारी तैनात आहेत. परंतु शहरातील गल्लीबोळात मात्र लोक निर्धास्तपणे फिरत आहेत. किराणा दुकान, भाजीच्या ठेल्यांवर गर्दी करत आहेत. गोपालनगरात तर एका ठिकाणी रोज गल्लीत क्रिकेटचे सामने रंगत आहेत. अशा स्थितीत पोलिसांनी अंतर्गत भागातदेखील ‘पॅट्रोलिंग’ वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.नागरिकांनो, तुम्हीच स्वत:चा जीव वाचवा‘कोरोना’चे संकट आणखी वाढण्यास सुरुवात झाली आहे. या आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल तर एकमेकांपासून अंतर राखणे अनिवार्य आहे. मात्र अद्यापही शहरातील अनेक नागरिकांना याची गंभीरता लक्षात आलेली नाही. ‘कुछ नहीं होता’ याच आविर्भावात ते आहेत. मात्र स्वत:चा आणि कुटुंबातील जीवलगांचा जीव वाचविणे हे त्यांच्याच हाती आहे. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत घरीच राहणे हे सर्वांच्या फायद्याचे ठरणार आहे. यासाठी सर्वांनी संयम राखला पाहिजे.थेट पोलिसांना कळवाप्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवणे हे पोलिसांनादेखील शक्य नाही. अशा स्थितीत तुमच्या सोसायटी, कॉलनी अथवा आजूबाजूच्या भागात कुणी विनाकारण घराबाहेर येऊन गप्पा मारत असतील, ‘सोशल डिस्टन्सिंग’ची गंभीरता राखत नसतील तर थेट पोलीस किंवा प्रशासनाला याची माहिती देऊ शकता. ‘कोरोना’विरोधातील या लढाईत सर्वांनी एकत्रित लढण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस