शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2022 3:14 PM

नागपुरात एकाच कढईत बनवला तीन हजार किलोचा महाप्रसाद

नागपूर : सुग्रास व्यंजन बनविण्यासाठी ओळखले जाणारे विश्वविक्रमधारी शेफ विष्णू मनोहर यांनी साऱ्यांचेच आराध्य असलेल्या बाप्पासाठी तब्बल ३ हजार किलोचा प्रसाद तयार केला आणि त्याचे वितरण केले. त्यांच्या या प्रसाद बनविण्याच्या उपक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि कढईमध्ये प्रसादाची सामग्री टाकण्यासोबतच डाव सुद्धा फिरवला.

श्रीगणेशोत्सवाच्या पर्वावर शेफ विष्णू मनोहर यांनी बाप्पासाठी अडीच हजार किलोचा चना डाळीचा प्रसाद तयार करण्याची आणि वितरित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बुधवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृतभवन येथे सकाळी ९ वाजतापासूनच तयारी सुरू झाली. चुलीवर कढई चढवण्यास सुरुवात झाली आणि दुसरीकडे प्रसिद्ध भजन गायक कमलेश पांडे यांचे सुरेल स्वर बाहेर पडू लागले. प्रसाद आणि गायनाची जणू जुगलबंदीच सुरू झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आ. ॲड. अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, जिल्हाधिकारी विपिन इटनकर आदींनी भेट देत प्रसाद बनविण्याच्या उपक्रमात आपला सहभाग दर्शवला.

या प्रसादासाठी सुमारे दीड हजार किलोची विशेष कढई ठेवण्यात आली होती. त्यात ६५० किलो चना डाळ, १०० किलो शेंगदाणे, १५० किलो खाण्याचे तेल, ८० किलो आले, १०० किलो कोथिंबिर व कढीपत्ता, ४० किलो धने पुड, १५ किलो जिरे, १० किलो गरम मसाला, २५ किलो मिठ, ५० किलो चिंच, २५ किलो गूळ, १० किलो हळद, १५ किलो तिखड, २ किलो हिंग व एक हजार लिटर पाणी अशी सामग्री वापरण्यात आली. अशा सगळ्या सामग्रीअंती प्रसादाचे वजन अडीच हजार किलोवरून तीन हजार किलोवर गेले.

प्रसाद तयार होत असताना सभागृहाबाहेर ढोल-ताशा पथकाच्या वादनाने वातावरण निर्मितीही केली होती. प्रसाद तयार होताच गणपती बाप्पाचा जयघोष करण्यात आला. आरतीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले आणि मोठ्या संख्येने नागरिक भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.

टॅग्स :Socialसामाजिकfoodअन्नGaneshotsavगणेशोत्सवVishnu Manoharविष्णु मनोहरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर