शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

विदर्भाला राज्यपालांकडून मिळाला निधी, पण अखर्चितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 10:29 IST

राज्यपालांच्या निर्देशावर राज्यातील नियोजन विभागाने २२ जुलै २०१९ रोजी हा निधी वितरित केला. तो विदर्भातील त्या ६० तालुक्यांमध्ये खर्च होणार होता, जे मानव संसाधन निदेशांकात अतिशय माघारले आहेत.

ठळक मुद्दे२२ जुलैला विदर्भाला मिळाले होते ५० कोटी मानव विकासात मागासलेल्या तालुक्यांवर होणार होता खर्चमुंबईत बोलावली बैठक

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानाचे कलम ३७१ (२) अंतर्गत मिळालेल्या विशेषाधिकारअंतर्गत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विदर्भाला ५० कोटी रूपयांचा निधी वितरित केला. परंतु सहा महिन्यानंतरही हा निधी खर्च होणे तर दूरच राहिले, निधी खर्च कुठे करायचा, याबाबतचा साधा प्रस्तावही मंजूर होऊ शकलेला नाही. निधी परत जाण्याच्या चिंतेमुळे राज्यपाल कोश्यारी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राजभवन मुंबई येथे याबाबतची बैठक आयोजित केली आहे.राज्यपालांच्या निर्देशावर राज्यातील नियोजन विभागाने २२ जुलै २०१९ रोजी हा निधी वितरित केला. तो विदर्भातील त्या ६० तालुक्यांमध्ये खर्च होणार होता, जे मानव संसाधन निदेशांकात अतिशय माघारले आहेत. यासोबतच क-वर्गलाही याचा लाभ होणार होता. शिक्षण, रोजगाराच्या संधी शोधणे व आरोग्य सेवांवर हा निधी खर्च होणे अपेक्षित होते. वर्धा वगळता विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली. (वर्धा जिल्हा हा लाभार्थी जिल्ह्याच्या यादीत नाहीत) प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना विदर्भ विकास मंडळाला प्रस्ताव पाठवून हे निश्चित करावयाचे होते की, हा निधी नेमका कुठे खर्च होणार आहे. परंतु मंडळाला एकाही जिल्ह्याने प्रस्ताव पाठविलेला नाही. मंडळाने दोनवेळा पत्र पाठवून पुन्हा प्रस्ताव आमंत्रित केले. परंतु कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही.राज्यपाल भगत सिंंह कोश्यारी यांनी यावर नाराजी व्यक्त करीत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान याबाबतचे प्रस्ताव तातडीने पाठविण्यास सांगितले होते. अखेर प्रस्ताव यायला सुरुवात झाली. परंतु वाशिम, यवतमाळ, जिल्ह्यातील प्रस्तावांची अजूनही प्रतीक्षा आहे. नगर परिषदांची उदासीनता अजूनही कायम आहे. परिस्थितीेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे.निधी परत जाण्याची शंकाडिसेंबर महिना जवळपास संपत आला आहे. चालू वित्तीय वर्ष ३१ मार्चला संपणार आहे. जर हा निधी लवकर खर्च झाला नाही तर तो परत जाईल. जिल्ह्याला निधी वितरित होण्याची लांबलचक प्रक्रिया पाहता हा निधी परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. निधीसाठी जिल्ह्यांना अगोदर विदर्भ विकास मंडळाकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे. मंडळ याची तपासणी करेल त्यानंतर मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला जाईल. तेथून हे प्रस्ताव मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद येथे जातील. आयुक्तालयातून मंजुरी मिळाल्यानंतर ते राजभवनात जातील, तेथून निधी थेट जिल्हाानिहाय वितरित होईल.विदर्भ विकास मंडळानेही व्यक्त केली चिंताराज्यपालांकडून आलेला निधी प्रशासनाच्या दिरंगाईत अडकल्याने विदर्भ विकास मंडळाने चिंता व्यक्त केली आहे. मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात सखोल चर्चा झाली. या चर्चेनंतर असा निर्णय घेण्यात आला की, मंडळ स्वत: जिल्हाधिकारी व न.प. सोबत संपर्क साधतील आणि प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवतील. बैठकीत अध्यक्ष चैनसुख संचेती, सदस्य सचिव हेमंत पवार, तज्ज्ञ सदस्य कपिल चंद्रायण आदी उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकार